शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधि महाविद्यालयानेच दिली सामाजिक उद्दिष्ट पूर्तीची शिकवण; न्यायमूर्ती नितीन सांबरे

By आनंद डेकाटे | Updated: March 15, 2024 15:40 IST

विधी क्षेत्रातील सर्वोच्च मापदंड आणि आयुष्याच्या प्रवासात सर्वोत्तम काय करावे याची शिकवण मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून मिळाली आहे.

नागपूर : विधी क्षेत्रातील सर्वोच्च मापदंड आणि आयुष्याच्या प्रवासात सर्वोत्तम काय करावे याची शिकवण मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून मिळाली आहे. सामाजिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी विचार करण्याची क्षमता तसेच त्याच्याशी लढण्याची प्रेरणा येथूनच मिळाली आहे. या महाविद्यालयाला मोठा इतिहास असून अनेक नामवंत विधीज्ञ या महाविद्यालयाने दिले आहेत. मला देखील या स्थानावर पोहोचण्याचे श्रेय या विधि महाविद्यालयाचेच आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात २१ वा वार्षिक राष्ट्रीय कायदा महोत्सव ‘जस्टा काॅजा’ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, संयोजक डॉ. प्रवीणा खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

न्यायमूर्ती सांबरे म्हणाले, १९८८ मध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना निर्माण झालेले ऋणानुबंध आजही तसेच कायम आहेत. १९९१-९२ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवडून आलो. त्यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाविद्यालयीन विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी होते. मात्र ते विरोधी पॅनलचे होते, असा अनुभव त्यांनी यावेळी त्यांच्या भाषणात विशद केला. या महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आहे. माजी विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय विसरत नसल्याचेही ते म्हणाले. १९८९ मध्ये महाविद्यालयात झालेल्या वादविवाद स्पर्धेत सहभागी झाल्यानेच मंचावर उभे राहण्याचे धाडस निर्माण झाले. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत कठीण परिश्रम करीत समाजातील समस्यांची सोडवणूक करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी केले. संचालन सुप्रिया रानडे व हर्षदा यांनी केले तर आभार संयोजक डॉ. प्रविणा खोब्रागडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. समय बनसोड, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे, ॲड. फिरदोस मिर्झा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.