शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची सरकारकडे आकडेवारीच नाही; माहितीच्या अधिकारांतर्गत बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:20 IST

Nagpur News कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोषणा केली, अंमलबजावणीचे काय?

 

आनंद डेकाटे

नागपूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केवळ घोषणाच नव्हे तर तसे शासननिर्णयच जारी केले होते. परंतु, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाच्या भीषण संकटात सर्वच जण होरपळून निघाले. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले, अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २८ जून २०२१ रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्या बैठकीत असे ठरले की, ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आई, वडील, पालक कोविडमुळे मृत झाले असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यानंतर ३० जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. तो सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही पाठवण्यात आला.

शासन निर्णय जारी होऊन आठ महिने झाले आहेत. त्यातील अंमलबजावणीचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अर्ज केला. यात त्यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मागितली. तसेच या योजनेत आतापर्यंत राज्यातील किती महाविद्यालयांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना लाभ दिला, किती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च माफ केला, याचा तपशील मागितला. परंतु, यावर विभागाने ‘याबाबतीत अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे माहिती देणे शक्य होणार नाही’ असे उत्तर देत आपले हात झटकले. एकूणच विभागाकडे कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच नाही तर मग त्यांना लाभ देणार तरी कसे व केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतापजनक व खेदजनक बाब

उच्च शिक्षण घेणाऱ्या कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आणि तेवढीच संतापजनक आहे, कारण कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावलेत. त्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी सरकाने घेतली होती. याचे स्वागतच, परंतु ही फक्त नावालाच होती का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने चौकशी व्हावी.

 

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस