शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची सरकारकडे आकडेवारीच नाही; माहितीच्या अधिकारांतर्गत बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:20 IST

Nagpur News कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोषणा केली, अंमलबजावणीचे काय?

 

आनंद डेकाटे

नागपूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केवळ घोषणाच नव्हे तर तसे शासननिर्णयच जारी केले होते. परंतु, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाच्या भीषण संकटात सर्वच जण होरपळून निघाले. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले, अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २८ जून २०२१ रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्या बैठकीत असे ठरले की, ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आई, वडील, पालक कोविडमुळे मृत झाले असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यानंतर ३० जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. तो सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही पाठवण्यात आला.

शासन निर्णय जारी होऊन आठ महिने झाले आहेत. त्यातील अंमलबजावणीचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अर्ज केला. यात त्यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मागितली. तसेच या योजनेत आतापर्यंत राज्यातील किती महाविद्यालयांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना लाभ दिला, किती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च माफ केला, याचा तपशील मागितला. परंतु, यावर विभागाने ‘याबाबतीत अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे माहिती देणे शक्य होणार नाही’ असे उत्तर देत आपले हात झटकले. एकूणच विभागाकडे कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच नाही तर मग त्यांना लाभ देणार तरी कसे व केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतापजनक व खेदजनक बाब

उच्च शिक्षण घेणाऱ्या कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आणि तेवढीच संतापजनक आहे, कारण कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावलेत. त्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी सरकाने घेतली होती. याचे स्वागतच, परंतु ही फक्त नावालाच होती का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने चौकशी व्हावी.

 

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस