शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची सरकारकडे आकडेवारीच नाही; माहितीच्या अधिकारांतर्गत बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:20 IST

Nagpur News कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोषणा केली, अंमलबजावणीचे काय?

 

आनंद डेकाटे

नागपूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केवळ घोषणाच नव्हे तर तसे शासननिर्णयच जारी केले होते. परंतु, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाच्या भीषण संकटात सर्वच जण होरपळून निघाले. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले, अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २८ जून २०२१ रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्या बैठकीत असे ठरले की, ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आई, वडील, पालक कोविडमुळे मृत झाले असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यानंतर ३० जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. तो सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही पाठवण्यात आला.

शासन निर्णय जारी होऊन आठ महिने झाले आहेत. त्यातील अंमलबजावणीचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अर्ज केला. यात त्यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मागितली. तसेच या योजनेत आतापर्यंत राज्यातील किती महाविद्यालयांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना लाभ दिला, किती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च माफ केला, याचा तपशील मागितला. परंतु, यावर विभागाने ‘याबाबतीत अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे माहिती देणे शक्य होणार नाही’ असे उत्तर देत आपले हात झटकले. एकूणच विभागाकडे कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच नाही तर मग त्यांना लाभ देणार तरी कसे व केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतापजनक व खेदजनक बाब

उच्च शिक्षण घेणाऱ्या कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आणि तेवढीच संतापजनक आहे, कारण कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावलेत. त्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी सरकाने घेतली होती. याचे स्वागतच, परंतु ही फक्त नावालाच होती का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने चौकशी व्हावी.

 

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस