शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची सरकारकडे आकडेवारीच नाही; माहितीच्या अधिकारांतर्गत बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:20 IST

Nagpur News कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोषणा केली, अंमलबजावणीचे काय?

 

आनंद डेकाटे

नागपूर : कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केवळ घोषणाच नव्हे तर तसे शासननिर्णयच जारी केले होते. परंतु, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाच्या भीषण संकटात सर्वच जण होरपळून निघाले. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले, अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २८ जून २०२१ रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्या बैठकीत असे ठरले की, ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आई, वडील, पालक कोविडमुळे मृत झाले असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यानंतर ३० जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. तो सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही पाठवण्यात आला.

शासन निर्णय जारी होऊन आठ महिने झाले आहेत. त्यातील अंमलबजावणीचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अर्ज केला. यात त्यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मागितली. तसेच या योजनेत आतापर्यंत राज्यातील किती महाविद्यालयांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना लाभ दिला, किती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च माफ केला, याचा तपशील मागितला. परंतु, यावर विभागाने ‘याबाबतीत अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे माहिती देणे शक्य होणार नाही’ असे उत्तर देत आपले हात झटकले. एकूणच विभागाकडे कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारीच नाही तर मग त्यांना लाभ देणार तरी कसे व केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतापजनक व खेदजनक बाब

उच्च शिक्षण घेणाऱ्या कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आणि तेवढीच संतापजनक आहे, कारण कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावलेत. त्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी सरकाने घेतली होती. याचे स्वागतच, परंतु ही फक्त नावालाच होती का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने चौकशी व्हावी.

 

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस