शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संसारातील दैनंदिन स्वरूपाचे वाद क्रूरता नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 08:00 IST

Nagpur News संसारातील दैनंदिन वादांना क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही. क्रूरता ही अतिशय गंभीर स्वरूपाची कृती असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

ठळक मुद्देपतीची घटस्फोटाची विनंती अमान्य

राकेश घानोडे

नागपूर : संसारातील दैनंदिन वादांना क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही. क्रूरता ही अतिशय गंभीर स्वरूपाची कृती असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

क्रूरता शारीरिक व मानसिक असू शकते. त्यामुळे प्राण व आरोग्य धोक्यात येते, तसेच शारीरिक इजा पोहोचण्याची शक्यता असते. परिणामी, पती व पत्नी यापैकी कोणीही क्रूरतापूर्ण वागत असल्यास, ते दीर्घ काळ एकत्र राहू शकत नाही, असे न्यायालयाने पुढे स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणातील पती नाशिक, तर पत्नी नागपूर येथील रहिवासी आहे. कुटुंब न्यायालयाने घटस्फोट याचिका फेटाळून लावल्यानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. परंतु, पतीला पत्नीची क्रूरता सिद्ध करता आली नाही. त्यामुळे ते अपीलही खारीज झाले. हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाला संस्कार मानले गेले आहे. लग्नामुळे दोन आत्म्यांचे मिलन होते. दोन व्यक्तींमध्ये प्रेम व आकर्षणाचे नाते निर्माण होते, असे मतदेखील न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.

असे होते आरोप-प्रत्यारोप

या दाम्पत्याचे दि. १ मे २००९ रोजी लग्न झाले. ते २०१४ पर्यंत एकत्र राहिले. दरम्यान, त्यांनी दोन अपत्यांना जन्म दिला. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पती सतत भांडतो. शिवीगाळ व मारहाण करतो, असे पत्नीचे म्हणणे होते. दुसऱ्या बाजूने, पत्नी मनमिळावू स्वभावाची नाही. ती कुटुंबातील सदस्यांसोबत उद्धटपणे वागते. क्षुल्लक कारणांवरून भांडण करते. स्वयंपाक करीत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत नाही, असे पतीचे आरोप होते.

घटस्फोट सोपा नाही 

उच्च न्यायालयातील ॲड. अनुप ढोरे यांनी पती व पत्नी यापैकी कोणालाही दैनंदिन स्वरूपाच्या वादामुळे घटस्फोट मिळणार नाही, याची तजवीज हिंदू विवाह कायद्यात करण्यात आली आहे, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली. न्यायालयेही किरकोळ वादांना महत्त्व देत नाही. त्यामुळे विवाहाचे महत्त्वाचे कायम राहते. कलम १४ अनुसार लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घटस्फोटासाठी याचिका दाखल करता येत नाही. तसे करण्यासाठी पीडित पक्षाचा अत्यंत अपवादात्मक स्वरूपाचा छळ होणे आवश्यक आहे, असेदेखील ॲड. ढोरे यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय