शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा केंद्र सरकारने कमी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 08:00 IST

Nagpur News केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत.

ठळक मुद्देकाळजीपूर्वक कर्ज मंजूर करण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले

कमल शर्मा

नागपूर : केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत. परिणामी, राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या वीज कंपन्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

या निर्णयापूर्वी वीज कंपन्यांना २५ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज देता येत होते. आता केवळ १० हजार कोटी रुपयापर्यंतच कर्ज मंजूर करता येणार आहे. राज्य सरकारने वीज कंपन्यांना कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे; परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना धक्का बसला आहे. महावितरण कंपनीचे ग्राहकांकडे ७० हजार कोटी रुपयावर वीज बिल थकीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला आठ हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. महावितरणकडे अदानी पॉवर कंपनीचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यापैकी १० हजार ६०० कोटी रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत अदानी कंपनीस अदा करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. महावितरणने आधीच ४५ हजार ४८६ कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी १३ हजार ४८६ कोटी रुपये परत करायचे बाकी आहे. राज्य सरकारने महानिर्मिती कंपनीला दोन हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना स्वत:ला सावरणे कठीण झाले आहे.

केंद्र सरकारसमक्ष अडचणी मांडल्या

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना आवश्यक कर्ज घेणे कठीण झाले आहे. ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारसमक्ष अडचणी मांडल्या आहेत. केंद्र सरकारने त्यावर सहानुभुतीपूर्वक विचार करायला हवा. याविषयी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनाही माहिती देण्यात आली आहे.

 नितीन राऊत, ऊर्जामंत्री.

वीज संकट उभे राहील

अदानी कंपनीला अन्य खर्चाच्या निधीतून थकबाकी अदा करण्याचा विचार महावितरण करीत आहे. तसे झाल्यास महावितरणला दैनंदिन खर्चाकरिता निधी उपलब्ध राहणार नाही, तसेच वीज खरेदीची रक्कम देता येणार नाही व कोळसा कंपन्यांना रक्कम अदा करणेही कठीण होईल. परिणामी, कोळसा पुरवठा अडचणीत येऊन वीज उत्पादन प्रभावित होईल. त्यातून वीज संकट निर्माण होऊ शकते.

टॅग्स :electricityवीज