शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा केंद्र सरकारने कमी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 08:00 IST

Nagpur News केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत.

ठळक मुद्देकाळजीपूर्वक कर्ज मंजूर करण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले

कमल शर्मा

नागपूर : केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत. परिणामी, राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या वीज कंपन्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

या निर्णयापूर्वी वीज कंपन्यांना २५ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज देता येत होते. आता केवळ १० हजार कोटी रुपयापर्यंतच कर्ज मंजूर करता येणार आहे. राज्य सरकारने वीज कंपन्यांना कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे; परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना धक्का बसला आहे. महावितरण कंपनीचे ग्राहकांकडे ७० हजार कोटी रुपयावर वीज बिल थकीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला आठ हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. महावितरणकडे अदानी पॉवर कंपनीचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यापैकी १० हजार ६०० कोटी रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत अदानी कंपनीस अदा करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. महावितरणने आधीच ४५ हजार ४८६ कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी १३ हजार ४८६ कोटी रुपये परत करायचे बाकी आहे. राज्य सरकारने महानिर्मिती कंपनीला दोन हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना स्वत:ला सावरणे कठीण झाले आहे.

केंद्र सरकारसमक्ष अडचणी मांडल्या

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांना आवश्यक कर्ज घेणे कठीण झाले आहे. ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारसमक्ष अडचणी मांडल्या आहेत. केंद्र सरकारने त्यावर सहानुभुतीपूर्वक विचार करायला हवा. याविषयी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनाही माहिती देण्यात आली आहे.

 नितीन राऊत, ऊर्जामंत्री.

वीज संकट उभे राहील

अदानी कंपनीला अन्य खर्चाच्या निधीतून थकबाकी अदा करण्याचा विचार महावितरण करीत आहे. तसे झाल्यास महावितरणला दैनंदिन खर्चाकरिता निधी उपलब्ध राहणार नाही, तसेच वीज खरेदीची रक्कम देता येणार नाही व कोळसा कंपन्यांना रक्कम अदा करणेही कठीण होईल. परिणामी, कोळसा पुरवठा अडचणीत येऊन वीज उत्पादन प्रभावित होईल. त्यातून वीज संकट निर्माण होऊ शकते.

टॅग्स :electricityवीज