शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उत्तर नागपुरात थॅलेसेमिया-सिकलसेलचे एक्सलन्स सेंटर

By admin | Updated: January 11, 2016 02:48 IST

थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे उद्घाटननागपूर : थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ केंद्राची घोषणा गेल्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. याचा पाठपुरावा केला जात आहे. या शिवाय थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास व अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.डॉ. विंकी रुघवानी चाईल्ड केअर सेंटर, जरीपटका येथील थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. विंकी रुघवानी व विकी कुकरेजा उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, थॅलेसेमिया व सिकलसेल हा रक्तजन्य व अनुवंशिक आजार आहे. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या हिवाळी अधिवेशनात या दोन्ही आजाराच्या उपचारासाठी उत्तर नागपुरात ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ची घोषणा करण्यात आली होती. याचा पाठपुरावा आ. मिलिंद माने करीत आहे. या सोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एस.टी. महामंडळाला १० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. या रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सवलती देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विवाहपूर्वी मुलामुलीची पत्रिका पाहिली जाते. परंतु पत्रिकेपेक्षा रक्ताची तपासणी करून थॅलेसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजारावर प्रतिबंध बसेल. सरकार याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेईल. सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अस्थिमज्जा प्रतिरोपण हा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी रुग्णाचा नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या प्रतिरोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल. या कक्षामार्फत आतापर्यंत ५० वर मुलांच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आ. डॉ. माने म्हणाले, सिकलसेल या आजराच्या निर्मूलन हेतू राजकारणात आलो. उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विवाहापूर्वी रक्ताची चाचणी करून निर्णय घेतल्यास हा आजार टाळता येण्यासारखा आहे. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. त्यांनी थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना येणाऱ्या समस्या मांडत शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मेयो व डागा रुग्णालयातून ‘कम्पोनंट’ रक्त दिले जात नसल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली. संचालन अ‍ॅड. वैशाली बागडे यांनी केले. आभार थॅलेसेमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)