शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

परवाना नूतनीकरणाकडे आॅटोचालकांची पाठ

By admin | Updated: December 2, 2015 03:26 IST

१९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला.

मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद : नागपुरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवाने रद्द होणार!नागपूर : १९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला. परवाने घेणे सोयीचे जावे याकरिता वारंवार मुदत वाढीसह शुल्कात कपात व शिक्षणाची अटही रद्द केली. ३० नोव्हेंबर शेवटीची तारीख होती. परंतु शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या नूतनीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. शहरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवान्याला आॅटोचालकांनी पाठ दाखविली आहे. राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा परवाने आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले होते. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर २०१५ देण्यात आली होती. नंतर ती वाढवून १६ नोव्हेंबर करण्यात आली होती. या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर जप्तीची मोहीमही सुरू केली, तरीही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्यांदा परिवहन विभागाने अंतिम मुदतीत वाढ करीत ती ३० नोव्हेंबर केली. या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आदेशही काढले, परंतु तरीही देखील आॅटोचालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)५० टक्केही प्रतिसाद नाही शहर आरटीओ व पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून ४२२४ आॅटो परवानांचे नूतनीकरणाला मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला १४७० आॅटोचालकांनी नूतनीकरण केले, परंतु आताच्या मोहिमेत फक्त २७३ परवान्यांचे नूतनीकरण झाले. यात कार्यालयाला ४३ लाख ५० हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला तर पूर्व आरटीओला २४२ परवानाचे नूतनीकरण होऊन २९ लाख ९ हजार ५१० रुपयांचा महसूल मिळाला. दोन्ही मिळून १९८६ परवान्यांना चालक मिळाले. उर्वरित २२३८ परवाने आदेशानुसार रद्द होणार आहेत. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचेही असेच चित्र आहे. १७७० परवान्यांना मंजुरी मिळाली असता केवळ १३१ परवान्यांचे वितरण झाले. तब्बल १६३९ परवाने अद्यापही पडून आहेत.