शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दहशतवाद जिहादी असू शकत नाही

By admin | Updated: December 27, 2015 03:16 IST

जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत.

तारिक अन्वर यांचे ठाम मत : ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ चर्चासत्रनागपूर : जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत. दहशतवाद जिहादी असूच शकत नाही, असे ठाम मत आॅल इंडिया कौमी तंझिमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले. आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे राज्य सचिव अजय पाटील, आसरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजिज सोळंकी, चार्टर्ड अकाऊटंट डॉ. तेजिंदरसिंग रावल, आॅल इंडिया कौमी तंझिमचे महाराष्ट्रचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे आणि शब्बीर विद्रोही उपस्थित होते. तारिक अन्वर म्हणाले, देशात सत्तारूढ सरकारचे सूत्रधार नागपुरात असल्यामुळे या चर्चासत्राचा प्रारंभ नागपुरात केला. पुढे देशातील सर्व राज्यात चर्चासत्र घेण्यात येणार आहे. व्यक्तीच्या भावना धर्माशी जुळल्या असल्यामुळे त्याला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी धर्म हा सोपा मार्ग समजला जात आहे. हे चुकीचे आहे. यासाठी एकाने दुसऱ्या धर्माला समजून घेण्याची गरज आहे. खा. विजय दर्डा म्हणाले, योग्यतेपुढे धर्म येऊ नये. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘आर्म्स फॉर पीस’च्या गोष्टी करणारे व्यवसाय करीत आहेत. आम्हाला काय करायचे आहे, हे प्रारंभी निश्चित करावे. यावेळी दर्डा यांनी महिला शिक्षणावर भर दिला. शिक्षण व्यक्ती बदलू शकते. विकास व रचनात्मकतेचे उदाहरण देताना त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला. अखंडता कायम राखामुनाफ हकीम म्हणाले, एका-एका शब्दाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांपासून सावध राहावे आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.दुफळी निर्माण करतो दहशतवाद इस्लामचे जाणकार मौलाना मुस्तफा रजा म्हणाले, गैरसमज शत्रुत्व निर्माण करते, तर शत्रुत्व दहशतवाद. अधिकाराचे रक्षण, अन्याय आणि दहशतवाद नष्ट करण्याचे काम जिहाद करते. जगातील अनेक संघटना मानवतेच्या शत्रू आहेत आणि जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढत आहे.ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे म्हणाले, हुसेन यांनी जे केले तो जिहाद होता. धर्मावर बोलणाऱ्या अनेकांना धर्माची फार कमी माहिती असते. दुसऱ्या धर्माची माहिती असायला हवी. डॉ. तेजिंदरसिंग रावल म्हणाले, शिखांनासुद्धा अशाच त्रास झाला होता. दहशतवादाला मुस्लीम सर्वाधिक बळी पडले आहेत. समाजात भीती निर्माण करणाऱ्यांचा धर्म केवळ दहशतवाद आहे. वरिष्ठ नेते शब्बीर विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्यांपूर्वी इंग्रज क्रांतिकारकांना दहशतवादी समजायचे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच क्रांतिकारांना देशभक्त समजले गेले. पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ) यांनी सांगितले आहे की, देशाप्रति प्रेम असणे, ही देशभक्ती आहे. आपल्यातील स्वार्थ आणि वाईट भावना दूर करण्याची लढाई म्हणजेच जिहाद आहे. संजय कोहचाडे म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात प्रेमाचे हत्यार यशस्वी ठरले आहे. जगात दहशतवाद पसरविला जात आहे. तो जिहाद नाही. येशू मसिहाच्या संदेशाचे पालन केले तर हा विषयच राहणार नाही. यावेळी अनिल देशमुख आणि अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. संचालन मो. आसीम अली यांनी केले. यावेळी ‘एआयक्यूटी’ विदर्भ सचिव मो. फझल पटेल, अमरावतीचे अब्दुल रफीक, वरोराचे शेख झहीरुद्दीन, यवतमाळचे मिर्झा वसीम बेग, अकोलाचे शेख वसीम, वर्धाचे इरफान बेग, नागपूरचे सलीम खान आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरूद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात मौलाना मुस्तफा रजा यांच्या ‘आतंकवादी संघठन इस्लाम की कसोटीपर’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ‘एआयक्यूटी’चे अध्यक्ष खासदार तारिक अन्वर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, अनिल देशमुख, अजय पाटील, डॉ. अजिज सोळंकी, सीए डॉ. तेजिंदरसिंग रावल, मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे, शब्बीर विद्रोही, मो. आसीम अली उपस्थित होते.