शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

हायकोर्टातील प्रकरणे स्थानांतरणासाठी नियम

By admin | Updated: December 12, 2015 06:03 IST

मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे अनेकदा समान विषयावरील प्रकरणे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे अनेकदा समान विषयावरील प्रकरणे दाखल होतात. अशावेळी नागपूर व औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणे मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशाने मुंबईत स्थानांतरित केली जातात. यामुळे नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या क्षेत्रातील पक्षकारांचा खर्च वाढतो. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच, प्रकरण स्थानांतरणाची कृती सरसकट केली जाऊ नये. त्यामागे पक्के कारण असावे, या बाबी लक्षात घेता मुख्य न्यायमूर्तींनी यासंदर्भात नियम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरण स्थानांतरित करण्यापूर्वी पक्षकारांना नोटीस व सुनावणीची संधी देण्याची तरतूद नियमात करण्यात येणार आहे. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामीन प्रकरणात याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर नागपूर खंडपीठातील सात वकिलांनी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांच्यामार्फत या प्रकरणात मध्यस्थी अर्ज करून याचिका स्थानांतरणासाठी निश्चित नियम असणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. राज्य शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय-माओवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या कारणावरून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांनी साईबाबाला ९ मे २०१४ रोजी अटक केली होती. साईबाबा ९० टक्के अपंग असून तो व्हीलचेअरशिवाय फिरू शकत नाही. अशा अवस्थेत त्याला कारागृहात ठेवण्यात आल्यामुळे मे-२०१५ मध्ये पवन डहाट यांनी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. त्यावरून अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. या पत्राची जनहित याचिका म्हणून दखल घेण्यात आली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाला ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. तसेच, जामीन कायम करण्यासाठी नियमित न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, साईबाबाने गेल्या आॅक्टोबरमध्ये नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)साईबाबाच्या अर्जावर निर्णय राखून४न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी शुक्रवारी साईबाबाच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्राला अटक झाल्यानंतर साईबाबाला अटक करण्यात आली होती. मिश्रा हा साईबाबा व छत्तीसगडमधील माओवादी यांच्यात माहितीची आदान-प्रदान करीत होता असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. साईबाबातर्फे वरिष्ठ वकील रेबेका जॉन (सर्वोच्च न्यायालय) व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.