शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

जागेच्या वादात अडकले टर्मिनल मार्केट

By admin | Updated: September 2, 2015 04:35 IST

शेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले

कमलेश वानखेडे ल्ल नागपूरशेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले टर्मिनल मार्केट जागेच्या वादात अडकले आहे. विदर्भातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या प्रकल्पात लक्ष घालावे व वेळ न घालवता पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.केंद्र सरकारतर्फे राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर (वारंगा) अशा तीन ठिकाणी टर्मिनल मार्केट उभारण्याची घोषणा २०१० मध्ये करण्यात आली. सार्वजनिक खासगी सहभागावर (पीपीपी) हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. वारंंगा टर्मिनल मार्केटसाठी नाफेडतर्फे ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नोडल एजंसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्य सरकारने संबंधित प्रकल्पासाठी महसूल विभागाची वारंगा येथील ९० एकर जमीन राज्य कृषी पणन मंडळाला हस्तांतरित केली. मंडळाने संबंधित प्रकल्पासाठी महापालिका, नासुप्र, अग्निशमन विभाग, पर्यावरण विभाग आदी विभागांकडून लागणारे ना हरकत प्रमाणपत्रही मिळविले.काय आहे टर्मिनल मार्केट ?४टर्मिनल मार्केटमध्ये सर्व सुविधायुक्त मार्केट विकसित केले जाते. येथे भाजीपाला, फळे यासह शेतमालाची खरेदी व विक्री केली जाते. कोल्ड स्टोरेज, मोठमोठे गोदाम उपलब्ध असतात. कृषीलाचे ग्रेडेशन करून दर्जेदार मालाची विभागणी केली जाते. मालाचे उत्तम पॅकेजिंग करण्याची व्यवस्था असते. मालाची गुणवत्ता कायम राखण्याची काळजी घेतली जाते. शेतकरी येथे आपला शेतमाल थेट आणू शकतात. दलाल किंवा मध्यस्थाची गरज नसते. शेतकऱ्यांकडून घेतलेला माल देशाच्या विविध भागात ट्रकने तसेच विदेशात कार्गो विमानांनी पाठविला जातो. टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध होतो.