शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

दहावी, बारावीचे ड्रॉपर्स वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६ महिने शाळाच उघडल्या नाही. आता ९ ते ...

नागपूर : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६ महिने शाळाच उघडल्या नाही. आता ९ ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षेपर्यंत मिळालेला वेळात केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे अवघड जाणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांची किंबहुना पालकांचीदेखील यंदा परीक्षा देण्याची मानसिकता नाही. शहरातील काही शाळांचा आढावा घेतला असता, पालकांकडूनच शिक्षकांना सांगण्यात आले की यंदा परीक्षेचे राहूच द्या.

दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या परीक्षांमध्ये चांगले स्कोअर केल्यानंतर ते आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतात. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायकच ठरले आहे. शाळा, शिकवणीवर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. ग्रामीण भागात तर ऑक्टोबरपर्यंत कुठल्याच हालचाली नव्हत्या. ऑक्टोबरनंतर ग्रामीणमध्ये काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण तांत्रिक अडचणीमुळे अध्यापन आणि अध्ययन शक्य झाले नाही. १४ डिसेंबरपासून ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र ५० टक्के विद्यार्थी अजूनही शाळेत आलेले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. पण ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही. महापालिकेच्या हद्दीतील काही शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. २० दिवसांत शाळेतील उपस्थिती लक्षात घेता २० ते २५ टक्केच विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहे. यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नाही आणि शिल्लक असलेल्या वेळेत तयारी पूर्ण होणे शक्यच नाही.

त्यामुळे यंदा परीक्षेतून ड्रॉप घेऊन, पुढच्या वर्षी परीक्षेची तयारी करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मानसिकता आहे. नाहीतरी वर्ष गेलेलेच आहे, उरलेल्या वेळेत विद्यार्थी काय साध्य करतील, अशी पालकांचीही मानसिकता आहे. शहरातील काही शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक स्वत: येऊन यंदा ड्रॉप दिला तरी चालेल, असे सांगून परीक्षेचा फॉर्मही भरत नाही.

- बोर्डाने तब्बल तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ

२०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला १५ डिसेंबर ते ४ जानेवारी परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर ५ जानेवारी ते १८ जानेवारी अशी मुदतवाढ दिली. आता पुन्हा १९ जानेवारी ते ६ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. बोर्ड वारंवार देत असलेल्या मुदतवाढीवरून निश्चित अपेक्षित विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले नसल्याचे दिसते आहे.