शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

दहावी, बारावीचे ड्रॉपर्स वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६ महिने शाळाच उघडल्या नाही. आता ९ ते ...

नागपूर : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६ महिने शाळाच उघडल्या नाही. आता ९ ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षेपर्यंत मिळालेला वेळात केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे अवघड जाणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांची किंबहुना पालकांचीदेखील यंदा परीक्षा देण्याची मानसिकता नाही. शहरातील काही शाळांचा आढावा घेतला असता, पालकांकडूनच शिक्षकांना सांगण्यात आले की यंदा परीक्षेचे राहूच द्या.

दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या परीक्षांमध्ये चांगले स्कोअर केल्यानंतर ते आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतात. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायकच ठरले आहे. शाळा, शिकवणीवर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. ग्रामीण भागात तर ऑक्टोबरपर्यंत कुठल्याच हालचाली नव्हत्या. ऑक्टोबरनंतर ग्रामीणमध्ये काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण तांत्रिक अडचणीमुळे अध्यापन आणि अध्ययन शक्य झाले नाही. १४ डिसेंबरपासून ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र ५० टक्के विद्यार्थी अजूनही शाळेत आलेले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. पण ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही. महापालिकेच्या हद्दीतील काही शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. २० दिवसांत शाळेतील उपस्थिती लक्षात घेता २० ते २५ टक्केच विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहे. यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नाही आणि शिल्लक असलेल्या वेळेत तयारी पूर्ण होणे शक्यच नाही.

त्यामुळे यंदा परीक्षेतून ड्रॉप घेऊन, पुढच्या वर्षी परीक्षेची तयारी करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मानसिकता आहे. नाहीतरी वर्ष गेलेलेच आहे, उरलेल्या वेळेत विद्यार्थी काय साध्य करतील, अशी पालकांचीही मानसिकता आहे. शहरातील काही शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक स्वत: येऊन यंदा ड्रॉप दिला तरी चालेल, असे सांगून परीक्षेचा फॉर्मही भरत नाही.

- बोर्डाने तब्बल तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ

२०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला १५ डिसेंबर ते ४ जानेवारी परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर ५ जानेवारी ते १८ जानेवारी अशी मुदतवाढ दिली. आता पुन्हा १९ जानेवारी ते ६ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. बोर्ड वारंवार देत असलेल्या मुदतवाढीवरून निश्चित अपेक्षित विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले नसल्याचे दिसते आहे.