शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

दहावीची परीक्षा ! आता वर्गातच उघडली जाणार प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:05 IST

आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देदररोज बदलणार सहायक परिरक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीची बोर्ड परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. यापूर्वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या कक्षात उघडून संबंधित पर्यवेक्षकाच्या त्यांच्या परीक्षा खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता प्रश्नपत्रिका वाटप करीत होते. परंतु आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.यापूर्वी केंद्र संचालकाच्या कक्षात पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अथवा २० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिकांचे बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका वर्गनिहाय वाटप केले जात होते. त्यामुळे पेपर बाहेर जाण्याची शक्यता जास्त होती. पेपर सुरू झाल्यानंतर केवळ अर्ध्या तासात संपूर्ण पेपरचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचविले जात असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारीला झालेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये बोर्डाने याबाबत सूचना केल्या आहेत.दहावीच्या परीक्षेत एका वर्गखोलीत २५ विद्यार्थी बसविण्याची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार २५ प्रश्नपत्रिका असलेले एक पाकीट पर्यवेक्षकाकडे सोपविले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर त्या केंद्रावरील केंद्र संचालक किंवा अतिरिक्त केंद्र संचालक कस्टडीत सोपविले जात होते. परंतु आता सहायक केंद्र संचालकाऐवजी सहायक परिरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे परिरक्षक सर्व पेपर कस्टडीयनपर्यंत सोडतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पेपरला परिरक्षक बदलणार आहेत.परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकाकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. नांद येथील जि. प. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एकूण ३४२ विद्यार्थी परीक्षा देणार असून केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परीक्षेदरम्यान पोलीस बंदोबस्त असणार आहे.- प्रकाश धोटे, केंद्र संचालक,जिल्हा परिषद हायस्कूल, नांद

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा