शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वादातून रोहण्यात तणाव

By admin | Updated: September 27, 2015 03:01 IST

सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने ...

रात्री बोलावली आकस्मिक आमसभा : ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्तखापरखेडा : सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी रेतीमाफियांकडे विचारणा केली. यातून वाद उद्भवल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच यावर निर्णय घेण्यासाठी रात्री उशिरा आकस्मिक आमसभाही बोलावण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.रोहणा शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पारडी रेतीघाटातून रेतीची मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. ही रेती रोहणामार्गे इतरत्र पाठविली जाते. रेतीचे ओव्हरलोड ट्रक रात्रभर धावतात. नागपूर महानगरपालिकेने रोहणा परिसरात कन्हान नदीवर पुलाचे बांधकाम केले असून, या पुलावरून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हा पूल वापरण्यास हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली असून, ओव्हरलोड व जड वाहनांना या पुलावरून वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हल्ली या पुलावरून ४० टन वजनाच्या रेतीच्या ट्रकची अव्याहतपणे वाहतूक सुरू आहे. वास्तवात या पुलाची क्षमता एवढ्या वजनाची नाही. असे असले तरी रेतीमाफिया या पुलावरून राजरोसपणे रेतीचे ओव्हरलोड ट्रक घेऊन जातात. दरम्यान, प्रकाश खापरे रा. रोहणा यांनी शुक्रवारी सकाळी एका ट्रकचालकास या पुलावरून ट्रक नेऊ देण्यास मनाई केली. त्यांनी सदर रेतीचा ओव्हरलोड ट्रक अडविल्याने ट्रकचालक व खापरे यांच्या वाद उद्भवला. त्यामुळे रेती व्यावसायिक लतीफ अन्सारी हा माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचला. त्याचवेळी माहिती मिळाल्याने ग्रामस्थही मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. ग्रामस्थ व लतीफ अन्सारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांनी प्रकाश खापरे यांची बाजू उचलून धरली होती. यावर तोडगा काढण्यासाठी सदर प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यातच शुक्रवारी रात्री स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने आकस्मिक आमसभा बोलावली. या आमसभेला महसूल विभागातील मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी रामटेके, पोलीस विभागातील बाबूलाल राठोड, पोलीसपाटील अरुण गोरले प्रामुख्याने उपस्थित होते. यात ग्रामस्थांनी रेतीमाफियांच्या जाचाचा पाढाच वाचला. रेतीमाफियांच्या अरेरावीला पोलिसांनीही दुजोरा दिला. दरम्यान, पोलिसांनी रेतीमाफियांशी हातमिळवणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आमसभेत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. (प्रतिनिधी)