शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मतदानादरम्यान संग्राम, नंदीग्राममध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० जागांवर ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दिवसभरात नंदीग्रामसह काही जागांवर हिंसेच्या घटना घडल्याने तणाव होता. बऱ्याच ठिकाणी भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. मतदानादरम्यान झालेल्या या संग्रामामुळे राजकीय वातावरणदेखील तापले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांकडे धाव घेतली व निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

सकाळच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांची गर्दी दिसून येत होती. विशेषत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. मतदानाशी संबंधित नियमांचा भंग होत असल्याचा दावा तृणमूलतर्फे करण्यात आला. नंदीग्राममध्येच निवडणूक आयोगाकडे तृणमूलकडून ६३ तक्रारी करण्यात आल्या. यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदान यांसारख्या घटनांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला.

ममता बॅनर्जी यांनी तक्रार करण्यासाठी थेट राज्यपाल जगदीश धनकड यांना फोन केला व भाजपकडून गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. धनकड यांनी टि्वट करून संबंधित बाबींबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आरोपांचे खंडन केले. मतदान जास्त झाल्याने तृणमूलला पराभव दिसायला लागला असल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, असे ते म्हणाले.

ममतांच्या दौऱ्यादरम्यान हिंसा

नंदीग्राम विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बोयल येथे ममता मतदानप्रक्रियेची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या असताना भाजपच्या समर्थकांनी जय श्रीरामचे नारे लावणे सुरू केले. ममता यांनी एका बूथवर ठाण मांडले. त्यानंतर भाजपा व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन तास तेथे तणावाचे वातावरण होते.

शुभेंदू अधिकारींच्या कारवर हल्ला

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी बूथचा दौरा करत असताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला व दगडफेक करण्यात आली. सोबतच नंदीग्राममधील ताकापुरा, संतेगाबाडी येथेदेखील दगडफेक झाली. विविध ठिकाणी अधिकारी यांची गाडी थांबवून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेराव केला. केशपूर विधानसभा क्षेत्रांतील भाजप उमेदवार तन्मय घोष यांच्या वाहनाचीदेखील तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार

निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान आमच्या तक्रारी गंभीरतेने घेतल्या नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. या मुद्द्यावर आयोगाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असून, इतर राज्यांतून आलेले गुंड अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.