शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ताण घेतोय प्राण !

By admin | Updated: July 20, 2015 03:07 IST

आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे.

योगेश पांडे नागपूरआज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे. उपलब्ध सुखसुविधांमध्ये वाढ होत असतानादेखील दैनंदिन जीवन मात्र ताणतणावाचे झाले आहे. यातूनच निर्माण होणाऱ्या कौटुंबिक कलहातून चक्क जीव देण्यापर्यंत लोकांची मजल जात आहे. २०१४ या वर्षात कौटुंबिक ताणामुळे नागपुरात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. आत्महत्यांत नागपूर राज्यात तिसरे२०१४ या वर्षात नागपुरात ५१३ जणांनी आत्महत्या केल्या. यात ४०० पुरुष व ११३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या आत्महत्येची टक्केवारी ही सुमारे ८० टक्के इतकी आहे. मुंबई व पुण्यानंतर नागपुरातच आत्महत्येच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. २०१३ साली शहरात ५२३ आत्महत्या झाल्या होत्या.‘तेरे बिन’ थेट आत्महत्याचदरम्यान, प्रेमसंबंधात आलेल्या अपयशामुळे प्रेमवीरांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. २०१४ वर्षात ३१ प्रेमवीरांनी जीव दिला. यात २० तरुण व ११ तरुणांचा समावेश आहे. मागील वर्षी आत्महत्येचा आकडा २१ होता. २०१० सालापासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ११३ जणांनी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या केल्या आहेत. जात, धर्म, वय, पैसे इत्यादी कारणांमुळे प्रेमाला घरातील लोकांचा विरोध होतो व यातूनच प्रेमात पडलेली व्यक्ती सारासर विचार न करता आयुष्याला संपविते. आश्चर्याची बाब म्हणजे रोजगार नसल्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असले तरी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बेरोजगारीच्या समस्येतून केवळ एकच आत्महत्या झाली. बेरोजगारीतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी खालावत आहे. २०१३ मध्ये ४, २०१४ मध्ये १० तर २०१० मध्ये १५ जणांनी या कारणातून जीव दिला होता.