शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

ताण घेतोय प्राण !

By admin | Updated: July 20, 2015 03:07 IST

आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे.

योगेश पांडे नागपूरआज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे. उपलब्ध सुखसुविधांमध्ये वाढ होत असतानादेखील दैनंदिन जीवन मात्र ताणतणावाचे झाले आहे. यातूनच निर्माण होणाऱ्या कौटुंबिक कलहातून चक्क जीव देण्यापर्यंत लोकांची मजल जात आहे. २०१४ या वर्षात कौटुंबिक ताणामुळे नागपुरात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. आत्महत्यांत नागपूर राज्यात तिसरे२०१४ या वर्षात नागपुरात ५१३ जणांनी आत्महत्या केल्या. यात ४०० पुरुष व ११३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या आत्महत्येची टक्केवारी ही सुमारे ८० टक्के इतकी आहे. मुंबई व पुण्यानंतर नागपुरातच आत्महत्येच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. २०१३ साली शहरात ५२३ आत्महत्या झाल्या होत्या.‘तेरे बिन’ थेट आत्महत्याचदरम्यान, प्रेमसंबंधात आलेल्या अपयशामुळे प्रेमवीरांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. २०१४ वर्षात ३१ प्रेमवीरांनी जीव दिला. यात २० तरुण व ११ तरुणांचा समावेश आहे. मागील वर्षी आत्महत्येचा आकडा २१ होता. २०१० सालापासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ११३ जणांनी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या केल्या आहेत. जात, धर्म, वय, पैसे इत्यादी कारणांमुळे प्रेमाला घरातील लोकांचा विरोध होतो व यातूनच प्रेमात पडलेली व्यक्ती सारासर विचार न करता आयुष्याला संपविते. आश्चर्याची बाब म्हणजे रोजगार नसल्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असले तरी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बेरोजगारीच्या समस्येतून केवळ एकच आत्महत्या झाली. बेरोजगारीतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी खालावत आहे. २०१३ मध्ये ४, २०१४ मध्ये १० तर २०१० मध्ये १५ जणांनी या कारणातून जीव दिला होता.