शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

दहा टक्के नागरिक होमिओपॅथीवर अवलंबून

By admin | Updated: February 14, 2016 02:58 IST

भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले ...

केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक : होमिओ-व्हिजन राष्ट्रीय परिषदेला सुरुवात नागपूर : भारताच्या उपचार पद्धतीचा वारसा होमिओपॅथी पद्धतीने आत्मसात केला आहे. या उपचार पद्धतीच्या विश्वसनीयतेमुळे होमिओपॅथीने एक वेगळे स्थान निर्माण केले असून देशातील दहा टक्के जनता आजही आपल्या आरोग्यासंदर्भात होमिओपॅथी उपचार पद्धतीवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे केले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होमिओपॅथिक फिजिशियन्स महाराष्ट्र राज्य (आयआयएचपी) तर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे होमिओपॅथतज्ज्ञांची ‘होमिओ व्हिजन नागपूर-२०१६’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रेन्झो गॅलसी, कोषाध्यक्ष डॉ. अ‍ॅल्टन अगोग्लू, सीसीआरचे महासंचालक डॉ. आर.के. मनचंदा, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे फॅकल्टी डीन डॉ. व्ही.आर. कवीश्वर, इस्रोचे विरेंद्र कुमार, आयआयएचपीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत दगडे, डॉ. एम.ए. राव, डॉ. अजय दहाट, व्ही.के. गुप्ता, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीश धुरट उपस्थित होते. श्रीपाद नाईक म्हणाले, भारतीय उपचार पद्धतींमध्ये संशोधनासाठी आता लक्ष घातले जात आहे. केंद्रीय होमीओपॅथी परिषद आणि अनुसंधान परिषद होमिओपॅथीत संशोधन करण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात स्वस्त आणि सुलभ उपचार पद्धतीमुळे माता मृत्यू दर, प्रजनन आणि जन्मलेल्या बाळांच्या मृत्यू दरावर नियंत्रण आणण्यासाठी होमिओपॅथी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकते. होमिओपॅथीवर लोकांना अधिकाधिक विश्वास वाढावा, यासाठी होमिओपॅथीचे शास्त्रोक्त तत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुष मंत्रालयांतर्गत शिक्षण, संशोधन, औषधींचा विकास आणि वैद्यकीय सेवा हे लक्ष्य साध्य करण्याचे कार्य केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. कवीश्वर यांनी सांगितले की, राज्यात ६६ हजार होमिओपॅथस्ची नोंदणी आहे. परंतु एकही डिस्पेन्सरी नाही. नागपुरात खासगी कॉलेज व डिस्पेन्सरी आहेत. तेव्हा शासकीय महाविद्यालयसुद्धा सुरू व्हावे, अशी मागणी केली. आर.के. मनचंदा, विरेंद्र कुमार, डॉ. गॅलसी, डॉ. गुप्ता यांनीही आपले विचार व्यक्त केले. रवींद्र दुरुगकर यांनी संचालन केले. डॉ. अजय दहाट यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)