शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगा आम्ही खेळायचे कसे? नागपुरातील बालगोपालांचा मनपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 10:25 IST

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून मनपाला केला जात आहे.

ठळक मुद्देघसरगुंडी तुटलेली, उद्यानाचीही दुर्दशामहापालिका प्रशासनाचे दुर्लक्षदेखभालीअभावी प्रचंड दुरवस्थाहिरवळ गायब आणि शौचालयाची दुर्गंधी

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून पालकांना केला जात आहे. महापालिकेने शहरात उद्याने उभारली आहेत. मात्र, या उद्यानांची पाहिजे तशी देखभाल केली जात नाही. शहरातील महापालिकेच्या भकास उद्यानाचे भयाण वास्तव समोर आले. बहुतांश उद्यानांच्या सभोवताल नागरिक कचरा आणून टाकतात. कचरागाडीही येथील कचरा दररोज उचलून नेत नाही. काही ठिकाणी कारंजे लावले आहेत; मात्र, त्यापैकी बहुतांश बंद आहेत. ‘लोकमत’ने नंदनवनमधील त्रिशताब्दी बालोद्यानाला भेट देऊन तेथील वास्तव जाणून घेतले तेव्हा अनेक असुविधा दिसून आल्या. शिवाय देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष दिसून आले.

बहुतांश खेळणी तुटलेलीउद्यानातील बहुतांश खेळणी तुटलेली आहेत. त्यामुळे लहानग्यांना उद्यानात खेळताना आई-वडिलांना त्यांच्यावर देखरेख ठेवावी लागले. तुटलेल्या खेळण्यामुळे गंभीर दुखापतीची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्यास धोकाबंद फाऊंटेनमुळे कित्येक दिवसांपासून येथे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्चून फाऊं टेन तयार केले, बंद ठेवून उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका