शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

तेलंगणातील स्थलांतरित कामगारांचा एसटीला ‘रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST

परतणाऱ्यांची संख्या वाढली : एसटी सुरू करणार सहा आंतरराज्यीय बसेस दयानंद पाईकराव नागपूर : लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्यामुळे तेलंगणा राज्यातील ...

परतणाऱ्यांची संख्या वाढली : एसटी सुरू करणार सहा आंतरराज्यीय बसेस

दयानंद पाईकराव

नागपूर : लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्यामुळे तेलंगणा राज्यातील हजारो कामगार आपल्या राज्यात परत गेले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे कामगार परत येणे सुरू झाले. सोबतच तेलंगणा राज्यात ये-जा करणाऱ्या इतर प्रवाशांची संख्याही वाढल्यामुळे एसटीला ‘रिस्पॉन्स’ वाढला आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने १ फेब्रुवारीपासून तेलंगणा राज्यात आदिलाबादसाठी ५ तर हैदराबादसाठी एक अशा सहा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. परप्रांतीय कामगारांना एसटीने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे कामगार परत नागपूर तसेच विदर्भात येणे सुरू झाले आहे. मात्र सध्या एसटीच्या दोनच बस हैदराबादला ये-जा करतात. या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे एसटी महामंडळाने तेलंगणा राज्यात सहा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तेलंगणा प्रादेशिक परिवहन आयुक्तांची परवानगी धेतल्यानंतर पॅसेंजर टॅक्स भरून सहा बसेस चालविण्याची मंजुरी मिळविण्यात आली आहे. आगामी १ फेब्रुवारीपासून या बसेस सुरू होणार आहेत. यात आदिलाबाद येथे सकाळी ५.३० वाजता, सकाळी ७ वाजता, सकाळी १०.४५ वाजता, सकाळी ११ वाजता आणि दुपारी ४ वाजता, तर हैदराबादसाठी सकाळी ८.१५ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत.

..............

एसटीने भरला ७.८० लाख पॅसेंजर टॅक्स

तेलंगणा राज्याशी झालेल्या करारानुसार एसटी महामंडळाला हैदराबादसाठी दोन आणि आदिलाबादसाठी दोन बसेस चालविण्याची परवानगी आहे. बसेस चालविण्यासाठी तेलंगणा राज्य परिवहन आयुक्तांकडे पॅसेंजर टॅक्स भरावा लागतो. तेलंगणा राज्यात सहा बसेस सुरू करावयाच्या असल्यामुळे एसटी महामंडळाला पॅसेंजर टॅक्सच्या रूपाने ७.८० लाख रुपये भरावे लागले. त्यानुसार तीन महिने या सहा बसेस तेलंगणा राज्यात ये-जा करू शकतील.

महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार

‘अनलॉकनंतर तेलंगणा राज्यात बसेस सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना मिळण्यास विलंब झाला. परंतु १ फेब्रुवारीपासून तीन महिन्यांसाठी परवाना मिळाल्यामुळे सहा बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार असून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

............