शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : राज्यात पीएम किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे देशात राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या योजनेत कृषी ...

नागपूर : राज्यात पीएम किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे देशात राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या योजनेत कृषी विभागासोबतच महसूल व ग्रामविकास या तीनही विभागांचा वाटा असताना केंद्र सरकारने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाला सन्मानित केले. त्यामुळे महसूल विभाग नाराज झाला असून, योजनेच्या अंमलबजावणीत आम्ही कंचे खेळले का? असा नाराजीचा सूर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आवळला आहे. योजनेचे कामच ८ मार्चपासून बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळे येत्या काळात योजनेचे काम खोळंबण्याचे आणि शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दोन-दोन हजार एवढे अनुदान देऊन वर्षभरात एकूण सहा हजाराचे अनुदान दिले जाते. देशातील इतर राज्यात फक्त कृषी विभाग या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काम करते. मात्र, महाराष्ट्र राज्यात महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन खात्यांनी मिळून या योजनेत काम केले होते. त्यामुळे राज्यात उत्कृष्ट काम होऊन तब्बल ९७२०८२३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला होता. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पाहता महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. मात्र, नुकतेच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील उत्कृष्ट कायार्साठी फक्त कृषी विभागाला सन्मानित केले. त्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी चांगलेच संतापले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने ८ मार्चपासून पीएम किसान योजनेत काम न करण्याचे सांगत, शासनाने या योजनेची सर्व जबाबदारी आता कृषी विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

- आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही दिलेल्या निवेदनात उल्लेख केला की, योजनेच्या यशासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जास्त मेहनत घेतली. महसूल विभागाने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनविल्या, त्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली, माहिती चुकल्यानंतर त्यातील त्रुटीही दूर केल्या, चुकीच्या शेतकऱ्यांना योजनेचे लाभ गेल्यानंतर कारवाईही महसूल कर्मचाऱ्यांवरच झाली. महसूल विभागाचे योजनेत योगदान असताना मात्र पुरस्कार देताना केंद्र सरकारने फक्त कृषी विभागाचे योगदान नजरेत घेतले.

सुरेश बगळे,

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना