शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : राज्यात पीएम किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे देशात राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या योजनेत कृषी ...

नागपूर : राज्यात पीएम किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे देशात राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या योजनेत कृषी विभागासोबतच महसूल व ग्रामविकास या तीनही विभागांचा वाटा असताना केंद्र सरकारने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाला सन्मानित केले. त्यामुळे महसूल विभाग नाराज झाला असून, योजनेच्या अंमलबजावणीत आम्ही कंचे खेळले का? असा नाराजीचा सूर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आवळला आहे. योजनेचे कामच ८ मार्चपासून बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळे येत्या काळात योजनेचे काम खोळंबण्याचे आणि शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दोन-दोन हजार एवढे अनुदान देऊन वर्षभरात एकूण सहा हजाराचे अनुदान दिले जाते. देशातील इतर राज्यात फक्त कृषी विभाग या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काम करते. मात्र, महाराष्ट्र राज्यात महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन खात्यांनी मिळून या योजनेत काम केले होते. त्यामुळे राज्यात उत्कृष्ट काम होऊन तब्बल ९७२०८२३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला होता. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पाहता महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. मात्र, नुकतेच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील उत्कृष्ट कायार्साठी फक्त कृषी विभागाला सन्मानित केले. त्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी चांगलेच संतापले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने ८ मार्चपासून पीएम किसान योजनेत काम न करण्याचे सांगत, शासनाने या योजनेची सर्व जबाबदारी आता कृषी विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे.

- आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही दिलेल्या निवेदनात उल्लेख केला की, योजनेच्या यशासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जास्त मेहनत घेतली. महसूल विभागाने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनविल्या, त्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली, माहिती चुकल्यानंतर त्यातील त्रुटीही दूर केल्या, चुकीच्या शेतकऱ्यांना योजनेचे लाभ गेल्यानंतर कारवाईही महसूल कर्मचाऱ्यांवरच झाली. महसूल विभागाचे योजनेत योगदान असताना मात्र पुरस्कार देताना केंद्र सरकारने फक्त कृषी विभागाचे योगदान नजरेत घेतले.

सुरेश बगळे,

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना