शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक

By admin | Updated: June 7, 2015 02:40 IST

देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

नितीन गडकरी : कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन विषयावर चर्चासत्रनागपूर : देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. गावात कंपन्या आल्या तर शेतकऱ्यांना रोजगार मिळेल. युवकांना मजबुरीने शहरात येऊन रिक्षा ओढण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी कोणते तंत्रज्ञान फायद्याचे आहे यावर काम होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.कृषी मंत्रालय अंतर्गत आय.सी.ए.आर.-जी. टी. सी. सिरकॉट, नागपूर इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट मुंबई, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अमरावती रोड येथील राष्ट्रीय माती सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोच्या डॉ. एस.पी. चौधरी सभागृहात आयोजित या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयसीएआर मुंबईचे संचालक डॉ. पी.जी. पाटील, इंडियन सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट मुंबईचे सचिव डॉ. ए.जे. शेख, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष जी.एच. वैराळे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात मजूर, शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर चिंताजनक आहे. यावर विचार करून योग्य पाऊल न उचलल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानासोबतच ‘इकोनॉमी वायोब्लिटी’चे होणेही आवश्यक आहे. देशात रोजगाराची समस्या मोठी आहे. आणि सर्वात जास्त रोजगार ग्रामीण भागात निर्माण करण्याची खरी गरज आहे. परंतु दुर्भाग्यपूर्ण मागील अनेक वर्षांपासून ज्या नीतीवर आम्ही चाललो त्यामुळे गावाचा विकास तर दूर राहिला, उलट तो खुंटला. परिणामी २८ टक्के लोकसंख्येला गावातून शहरात येणे भाग पडले. विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीतजास्त संधी उपलब्ध होतील असे कार्य करणे आवश्यक आहे. कार्यक्रमात कृषीवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आभार डॉ. ए.जे. शेख यांनी मानले.(प्रतिनिधी)