शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

गावांमध्ये तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक

By admin | Updated: June 7, 2015 02:40 IST

देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

नितीन गडकरी : कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन विषयावर चर्चासत्रनागपूर : देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. गावात कंपन्या आल्या तर शेतकऱ्यांना रोजगार मिळेल. युवकांना मजबुरीने शहरात येऊन रिक्षा ओढण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी कोणते तंत्रज्ञान फायद्याचे आहे यावर काम होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.कृषी मंत्रालय अंतर्गत आय.सी.ए.आर.-जी. टी. सी. सिरकॉट, नागपूर इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट मुंबई, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अमरावती रोड येथील राष्ट्रीय माती सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोच्या डॉ. एस.पी. चौधरी सभागृहात आयोजित या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयसीएआर मुंबईचे संचालक डॉ. पी.जी. पाटील, इंडियन सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट मुंबईचे सचिव डॉ. ए.जे. शेख, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष जी.एच. वैराळे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात मजूर, शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर चिंताजनक आहे. यावर विचार करून योग्य पाऊल न उचलल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानासोबतच ‘इकोनॉमी वायोब्लिटी’चे होणेही आवश्यक आहे. देशात रोजगाराची समस्या मोठी आहे. आणि सर्वात जास्त रोजगार ग्रामीण भागात निर्माण करण्याची खरी गरज आहे. परंतु दुर्भाग्यपूर्ण मागील अनेक वर्षांपासून ज्या नीतीवर आम्ही चाललो त्यामुळे गावाचा विकास तर दूर राहिला, उलट तो खुंटला. परिणामी २८ टक्के लोकसंख्येला गावातून शहरात येणे भाग पडले. विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीतजास्त संधी उपलब्ध होतील असे कार्य करणे आवश्यक आहे. कार्यक्रमात कृषीवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आभार डॉ. ए.जे. शेख यांनी मानले.(प्रतिनिधी)