शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST

नागपूर : सर्पदंंश होणे ही दुर्घटना आहे. मात्र, हा अपघात की नैसर्गिक घटना, यावर अद्यापही दुमत आहे. यासंदर्भात वैद्यकीय ...

नागपूर : सर्पदंंश होणे ही दुर्घटना आहे. मात्र, हा अपघात की नैसर्गिक घटना, यावर अद्यापही दुमत आहे. यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात एकवाक्यता नसल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेचाला सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या केस पेपरवर बरेचदा एमएलसी (मेडिकल लीगल केस) असा उल्लेख नसल्याने अडचण उद्भवत आहे.

सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णाला उपचारासाठी दाखल करताना केस पेपरवर एमएलसी उल्लेख अपेक्षित असतो. मात्र, अपघात की नैसर्गिक घटना अशा द्विधा मानसिकतेमधील डॉक्टरांकडून अशी नोंद होत नाही. रुग्णांचे नातेवाईक जागरूक असले तर डॉक्टरांशी चर्चा करून तसा उल्लेख करून घेतात. मात्र, बहुतेक घटना खेड्यातील व्यक्तींसोबत घडत असल्याने त्यांना यासंदर्भात ज्ञान नसते, तातडीने उपचार महत्त्वाचा असल्याने विचारणा करण्याची मानसिकता नसते. अशा वेळी रुग्णांचे केस पेपर एमएलसी उल्लेखाविनाच राहतात.

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा केली असता, रुग्णाने सांगितलेल्या माहितीवरून डॉक्टरांनी प्रकरण समजून घ्यावे व त्यानंतर केस पेपर एमएलसी नोंद घेण्याबाबत ठरवावे, असा प्रघात असल्याचे सांगितले. मात्र, यासंदर्भात स्पष्टता नसल्याने अनेक प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा गोंधळ उडत असल्याचे दिसते.

एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या घटनेमध्ये रुग्णाच्या शरीरात विष भिनल्यावर किडनी, तसेच अन्य अवयव निकामी होतात. प्रसंगी मृत्यूही ओढावतो. मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे आवश्यक असल्यामुळे दाखल करतानाच एमएलसी नोंद केलेली योग्य ठरते. जिल्हास्तरावरील अनेक शासकीय रुग्णालयांमधून सर्पदंशाच्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी रेफर करायचे असल्याने केस पेपरवर एमएलसीची नोंद आवश्यक ठरते.

...

नागपुरातील मेयोमध्ये वर्षाला ९० वर रुग्ण येथील मेयोमध्ये सर्पदंशाचे वर्षाला ९० वर रुग्ण येतात. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात विषबाधेवरील उपचाराची अद्ययावत सुविधा आहे. तिथे दाखल होणाऱ्या विषबाधेच्या रुग्णांचा आकडा अधिक असतो. वर्धामधील मेघे हाॅस्पिटलमध्येही वर्षाला ४५ च्या वर सर्पदंशाचे रुग्ण असतात. गडचिरोली, चंद्रपुरातही ही संख्या अधिक आहे. अनेकदा रुग्णाला रेफर करताना एमएलसी नोंद नसल्यास तांत्रिक अडचण येते.

...

असा आहे तांत्रिक पेच

अचानक सापावर पाय पडल्याने तो डिवचला गेल्यास दंश करतो. अपघात जाणीवपूर्वक होत नाही, तसाच सर्पदंशही जाणीवपूर्वक करून घेतला जात नाही. तो सुद्धा अपघातच असतो. एखाद्याचा काटा काढण्याच्या हेतूने मुद्दाम सर्पदंश केला जात असल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात तपासानंतर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कायदेशीर अधिकार आहेत.

...

कोट

विषारी सर्पदंशावर उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळे एमएलसी होणे आवश्यकच आहे. तो अपघातच मानला जावा. तांत्रिक अडचण येत असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना कॉल द्यावा.

- श्रीकांत उके, सर्पमित्र, नागपूर