शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल, संगणकामुळे आटत आहेत डोळ्यातील अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 11:17 IST

मोबाइल, संगणक, लॅपटॉपचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देजे लोक संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलचा खूप जास्त वापर करतात, त्यांनी दहा मिनिटांमध्ये एका मिनिटासाठी डोळे मिटावे. परंतु जोरात डोळे मिटू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकजण मोबाईल, संगणक, लॅपटॉपवर खूप जास्त वेळ घालवितात. याचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण साधारण दर मिनिटाला ३० वेळा पापण्या लवतो. परंतु जेव्हा आपण या ‘गॅजेट’वर एखादा व्हिडिओ, चित्रपट किंवा चित्रे पाहतो तेव्हा पापण्या लवण्याचे प्रमाण १०-१२ वेळापर्यंतच होते. परिणामी, डोळ्यात अश्रू तयार करणाऱ्या कार्यावर याचा प्रभाव पडतो. डोळ्यातील अश्रू हवेतील वातावरणामुळे आटतात. परिणामी, कृत्रिम अश्रूची म्हणजे ‘आय ड्रॉप’ची गरज पडते. काहींना आयुष्यभर या ड्रॉपची गरज पडू शकते, अशी माहिती आॅल इंडिया आॅप्थलमोलॉजी सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. कुरेश मस्कटी यांनी दिली.आॅप्थलमोलॉजिकल सोसायटी नागपूरचा (ओएसएन) पदग्रहण सोहळा रविवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मस्कटी तर विशेष अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे उपस्थित होते. मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावरच येतातभारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु अजूनही हवी त्या प्रमाणात जनजागृती नसल्याने मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावर किंवा अंधत्व आल्यावरच डॉक्टरांकडे येतात. विशेषत: मधुमेहामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतरही डोळ्यात पुन्हा रक्तस्राव होण्याची शक्यता असते. कारण, डोळ्याच्या नसा फार पातळ झालेल्या असतात. वारंवार शस्त्रक्रियाही अनेकांसाठी परडवणाऱ्या नसतात. यामुळे मधुमेहाचे निदान होताच नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेहीने वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. मस्कटी यांनी दिला.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चष्मा टाळता येतोमोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम नेत्रभिंग (इंट्रॉक्युलर लेन्स) टाकले जाते. आता यात अद्यावत ‘लेन्स’ही उपलब्ध होऊ लागले आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना जवळचे किंवा दूरचे दृष्टिदोष असायचे त्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चष्मे वापरावे लागायचे. परंतु आता असे काही लेन्स उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे चष्म्याची गरजच पडत नाही. ‘रेटीना’च्या रुग्णांसाठी अनेक नवे इंजेक्शन उपलब्ध झाल्याने अंधत्वाला प्रतिबंध घालणे शक्य झाले आहे, असेही डॉ. मस्कटी म्हणाले.

एका बुबुळाचे दोघांमध्ये प्रत्यारोपण शक्यडॉ. मस्कटी म्हणाले, नेत्रदानातून मिळणाऱ्या एका बुबुळाचे प्रत्यारोपण एकाच रुग्णामध्ये होते. परंतु आता ज्या रुग्णांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करायचे असेल आणि त्या रुग्णाच्या बुबुळाच्या आतील भागात दुखापत झाली असेल तर तेवढाच भाग बदलविला जातो, किंवा ज्या रुग्णाचा बाहेरच्या भागात दुखापत झाली असेल तर तेवढाचा भाग बदलविण्यात येतो. यामुळे एका बुबुळाचा दोन रुग्णांमध्ये वापर होऊ शकतो. हे एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. याचा फायदा अंधत्व निवारण मोहिमेला होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान