शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा व्यापक विस्ताराचा संकल्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST

समन्वय बैठकीत निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक नागपुरात सुरू आहे. शनिवारी बैठकीच्या ...

समन्वय बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक नागपुरात सुरू आहे. शनिवारी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी संघटनेच्या व्यापक विस्ताराचा संकल्प करण्यात आला. २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बैठकीत शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: युवकांना संघटनेत जोडण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यावर भर देण्यात आला. संघाची कोर कमिटीची बैठक रविवारी होण्याची शक्यता संघ सूत्रांनी वर्तविली आहे.

शुक्रवारी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीत देशातील परिस्थितीपासून तालीबानच्या उदयानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर गंभीर चर्चा झाली. रेशिमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात आयोजित या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सर्व सरकार्यवाह व संघाशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भाजपाकडून पक्षाचे संघटन महासचिव बी.एल. संतोष यांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी संघटनेने वर्षभर केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. दुसऱ्या दिवशी प्रदीर्घ चर्चेचे सत्र चालले. सूत्रानुसार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या दरम्यान संघाच्या शताब्दी वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, संघाचे शताब्दी वर्ष २०२४ ते २५ दरम्यान साजरे करण्यात येणार आहे; परंतु याची तयारी आतापासून सुरू व्हायला हवी. या माध्यमातून संघटना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही संघटनेच्या विस्तारासाठी आवश्यक पाऊल उचलले जातील.

- बॉक्स

किसान व मजदूर संघानेही मांडली आपली बाजू

बैठकीबाबत संघाने अतिशय गोपनीयता बाळगली. कोविड प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धी माध्यमांनाही स्मृती भवनात प्रवेश देण्यात आला नाही. सूत्रांनुसार भारतीय किसान संघ व भारतीय मजदूर संघाने बैठकीत आपले म्हणणे मांडले. त्यांनी शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठोस पाऊल उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय किसान संघाने आधारभूत किमतीबाबत केंद्र सरकारचा विरोध केला.

- बॉक्स

कोविडमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांना मिळणार गती, पश्चिम बंगालवर चिंता

कोविड संकटामुळे संघाचे अनेक कार्य प्रलंबित राहिले. भूमी सुपोषण अभियानालाही अपेक्षित यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत संघटनेच्या कार्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच बैठक होईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर भडकलेल्या हिंसेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. तिथे स्वयंसेवकांच्या घरावर झालेले हल्ले ही गंभीर बाब असून, ही माहिती देशभरात पसरविण्यावर बैठकीत जोर देण्यात आला.