शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

संघाचे टार्गेट पश्चिम बंगाल

By admin | Updated: March 25, 2017 02:46 IST

पश्चिम बंगाल राज्यात गेल्या काही वर्षापासून दहशतवाद्यांच्या हालचालीत वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे.

राज्यात जेहादी कारवाया वाढल्या : ममता सरकार मुस्लिम तुष्टीकरण करतेय नागपूर : पश्चिम बंगाल राज्यात गेल्या काही वर्षापासून दहशतवाद्यांच्या हालचालीत वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. राज्यातील विद्यमान ममता बॅनर्जी सरकार मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करीत असल्याच्या आरोपही केला आहे. नुकत्याच कोईम्बतूर येथे झालेल्या संघाच्या प्रतिनिधिक सभेत या कारवाया थांबविण्यात याव्या यासाठी प्रस्ताव पारित करून केंद्र आणि राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी दिली. शुक्रवारी पत्रपरिषदेत दीपक तामशेट्टीवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात बंगालमध्ये कोलकातासह इतर भागात कट्टरपंथीयांकडून हिंसक घटनाक्रम होत आहेत. पश्चिम बंगाल दहशतवाद्यांचा गड म्हणून उदयास येत आहे. राष्ट्रीय चौकशी एजन्सी (एनआयए)ने याबाबत दुजोरा दिला आहे. राज्य सरकार मात्र मुस्लिम व्होटबँकेचे राजकारण करीत या हिंसक कारवायांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात मदरसासारख्या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते व विद्याभारती शाळा बंद केल्या जात असल्याचा आरोप तामशेट्टीवार यांनी केला. प्रचार प्रमुख समीर गौतम, विदर्भ प्रचार प्रमुख अतुल पिंगळे, महानगर संघचालक राजेश लोया आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) पश्चिम विदर्भात जातीय भेदभाव रा.स्व. संघातर्फे समरसता कार्यक्रमांतर्गत गावांमध्ये एका गावात एक पाणवठा, एक स्मशानभूमी असा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत झालेल्या प्राथमिक पाहणीत विदर्भातील ४५० गावांमध्ये अशाप्रकार भेदभाव आढळून आल्याचे तामशेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पश्चिम विदर्भातील गावांचे प्रमाण अधिक होते. सध्या बुलडाणा जिल्ह्यात ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या पाच महिन्यात संघाच्या शाखांमध्ये पाच हजारांची वाढ झाली आहे. संघाद्वारे कोईम्बतूर येथील सभेनंतर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात संघाच्या ५७ हजार १८५ शाखा सुरू झाल्या असल्याची माहिती दीपक तामशेट्टीवार यांनी दिली. आॅक्टोबर २०१६ मध्ये ही संख्या ५२ हजार १०२ अशी होती. मागील वर्षी ग्रामस्तरावर झालेल्या प्रशिक्षण वर्गात २९१२७ शाखा प्रतिनिधी व १ लाख ४२५६ प्रशिक्षणार्थिंनी प्रशिक्षण घेतले. देशात संघाचे ५४९४५ मंडळ असून २२६०६ ठिकाणी संघ शाखा आहेत. यामध्ये संपर्कयुक्त शाखांची संख्या ८७९७ एवढी आहे. संघाच्या विविध संघटनांकडून देशभरात १ लाख ७०७०० प्रकारचे सेवाकार्य सुरू असल्याचे तामशेट्टीवार यांनी स्पष्ट केले. विदर्भात शाखांची संख्या स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भात ११४९ गावांमध्ये १८८० शाखा आहेत. देशात भाजपाची सत्ता असल्याने किंवा गणवेश बदलल्याने शाखा वाढल्याचा दावा त्यांनी यावेळी नाकारला.