शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

संघाचा सरकारवर रिमोट नाही

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी ..

पत्रपरिषद : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा युक्तिवाद

नागपूर : लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत संघाची महत्त्वाची भूमिका होती. देशातील लोकांनाही परिवर्तन हवे होते. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ३0-३५ वर्षांंनंतर केंद्रात स्थिर सरकार येत आहे. नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रि या आहे. यात सरकार, प्रशासन, नागरिक व राजकीय पक्ष या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवीन सरकार ठोस पावले उचलतील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली. भारतातील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संघाने केले होते. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शांततेच्या वातावरणात ही प्रक्रि या पार पडली. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ही एक सामान्य प्रक्रि या असते. त्यामुळे मनातील कटुता विसरून राजकीय नेत्यांनी सकारात्मक विचारांनी या निवडणुका घ्याव्या, असे आवाहन जोशी यांनी केले. जात, धर्माच्या आधारावर निर्णय न घेता, देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून सरकार निर्णय घेईल. शोषणमुक्त व सक्षम समाज निर्माण करण्यात सरकारला यश येईल, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला संघाचे महानगर संघटक दिलीप गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)