शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

संघाचा सरकारवर रिमोट नाही

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी ..

पत्रपरिषद : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा युक्तिवाद

नागपूर : लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत संघाची महत्त्वाची भूमिका होती. देशातील लोकांनाही परिवर्तन हवे होते. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ३0-३५ वर्षांंनंतर केंद्रात स्थिर सरकार येत आहे. नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रि या आहे. यात सरकार, प्रशासन, नागरिक व राजकीय पक्ष या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवीन सरकार ठोस पावले उचलतील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली. भारतातील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संघाने केले होते. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शांततेच्या वातावरणात ही प्रक्रि या पार पडली. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ही एक सामान्य प्रक्रि या असते. त्यामुळे मनातील कटुता विसरून राजकीय नेत्यांनी सकारात्मक विचारांनी या निवडणुका घ्याव्या, असे आवाहन जोशी यांनी केले. जात, धर्माच्या आधारावर निर्णय न घेता, देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून सरकार निर्णय घेईल. शोषणमुक्त व सक्षम समाज निर्माण करण्यात सरकारला यश येईल, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला संघाचे महानगर संघटक दिलीप गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)