शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा सरकारवर रिमोट नाही

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी ..

पत्रपरिषद : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा युक्तिवाद

नागपूर : लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत संघाची महत्त्वाची भूमिका होती. देशातील लोकांनाही परिवर्तन हवे होते. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ३0-३५ वर्षांंनंतर केंद्रात स्थिर सरकार येत आहे. नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रि या आहे. यात सरकार, प्रशासन, नागरिक व राजकीय पक्ष या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवीन सरकार ठोस पावले उचलतील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली. भारतातील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संघाने केले होते. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शांततेच्या वातावरणात ही प्रक्रि या पार पडली. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ही एक सामान्य प्रक्रि या असते. त्यामुळे मनातील कटुता विसरून राजकीय नेत्यांनी सकारात्मक विचारांनी या निवडणुका घ्याव्या, असे आवाहन जोशी यांनी केले. जात, धर्माच्या आधारावर निर्णय न घेता, देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून सरकार निर्णय घेईल. शोषणमुक्त व सक्षम समाज निर्माण करण्यात सरकारला यश येईल, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला संघाचे महानगर संघटक दिलीप गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)