शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पाल्यांची भरावी लागणार पूर्ण शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST

नागपूर : राज्यातील खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यामिक अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरकारने झटका दिला ...

नागपूर : राज्यातील खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यामिक अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरकारने झटका दिला आहे. १९९५ च्या शासन परिपत्रकात बदल करून आता यापुढे त्यांच्या पाल्यांच्या पहिली ते स्नातकोत्तरपर्यंतच्या शिक्षणासाठी पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. या बदल्यात राज्य सरकार त्यांना फक्त ३ हजार ते ८ हजार रुपयांची रक्कम परतावा म्हणून देणार आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नामांकित संस्थांमध्ये तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर शुल्काच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सरकारला कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करवा लागणार आहे. १९९५ च्या अध्यादेशानुसार, राज्य सरकार आधीच या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची शुल्क भरत असे. यामुळे त्यांना नि:शुल्क शिक्षण मिळण्याची सुविधा होती. नव्या बदलानुसार आता नाममात्र रक्कम परतावा म्हणून दिली जाणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना यापुढे स्वखर्चाने मुलांना शिकवावे लागणार आहे. हा निर्णय घेण्यामागे नेमके कारण सरकारने जाहीर केलेले नाही. शिक्षकांच्या मते सरकार, जुन्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून नवा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने यापूर्वीही असा प्रयत्न केला होता. मात्र या विरोधात शिक्षक व काही शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार, सरकारला त्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती करावी लागत होती. खर्चकपातीचे पाऊल म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असावा, असेही या मागील कारण सांगितले जात आहे.

...

आंदोलन उभारणार

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह योगेश बन म्हणाले, हा निर्णय सरकारला जड जाईल. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा शुल्क महागला आहे. या बदल्यात फक्त ३ ते ८ हजार रुपये परत करणे सुसंगत नाही. सरकारला हा अध्यादेश रद्द करावा लागेल. असे न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.

...

हा तर छळच !

भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर म्हणाले, सरकारचा हा निर्णय म्हणजे खासगी अनुदानित शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा छळच आहे. राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.

...