शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिक्षक दिन विशेष; ...आणि मला विज्ञान विषयाची गोडी निर्माण झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 10:45 IST

माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या जीवनात पन्नालाल सरांचे महत्त्वाचे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकाच्या जीवनात एखादे शिक्षक असे असतात जे विद्यार्थ्यांचे आयुष्यच बदलून टाकतात. माझ्याही जीवनात असेच एक शिक्षक आहेत. ते म्हणजे पन्नालाल सर. नवव्या वर्गात शिकत असताना पन्नालाल सर आम्हाला विज्ञान शिकवायचे. विज्ञान हा विषय आम्हाला गुंतागुंतीचा वाटायचा. परंतु ते विज्ञान अतिशय सहज व सोप्या शब्दात समजावून सांगायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. ते शिकवायला लागले की आम्ही सर्व मुलं मंत्रमुग्ध होऊन जायचो. ते ज्या सहज-सोप्या पद्धतीने शिकवायचे त्यामुळेच मला विज्ञान या विषयाची प्रचंड गोडी निर्माण झाली. पुढे मी तोच विषय घेतला. माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली.विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये गोडी नसते. त्यामुळे ते विषय त्यांना कठीण वाटू लागतात. असाच एक विषय विज्ञान हा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना हा विषय आवडत नाही. परंतु आम्हाला पन्नालाल सरांसारखे शिक्षक लाभले. ते आपला विषय इतक्या लॉजिकली समजून द्यायचे की, त्यात आवड निर्माण व्हायची. त्यामुळे विद्यार्थी त्या विषयाकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचे. त्यात ते पारंगत व्हायचे. पन्नालाल सरांमुळे माझे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून गेले असे मला वाटते. त्यांनी विषयांबद्दलची जी गोडी माझ्यात निर्माण केली, तिला तोड नाही. आजच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक विषयात गोडी निर्माण करणारे पन्नालाल सर यांच्यासारखे शिक्षक लाभावे.अन ‘रट्टा’ मारणे बंद झालेआम्ही जम्मू काश्मीरला राहात होतो. जम्मूमधील हायस्कूलला मी शिकत होतो. तेव्हाचे शिक्षण हे पाठांतर रट्टा मारणे असेच होते. आमच्याकडेही तसाच प्रकार चालायचा. आम्हीही रट्टा मारतच शिकत होतो. सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास हे सर्व विषय केवळ रट्टा मारतच शिकत होतो. परंतु त्या विषयांमध्ये फारशी गोडी काही वाटत नव्हती. चांगले गुण घेऊन पास होणे इतक्यापर्यंतच मर्यादित होते. विषय समजून घेणे हे काय असते, याची जाणीवसुद्धा नव्हती. आठव्या वर्गापर्यंत हे असेच चालत राहिले. परंतु नवव्या वर्गात आम्ही गेलो. तेव्हा पन्नालाल सर आले आणि विषयांकडे पाहण्याची व ती शिकून समजून घेण्याची आमची दृष्टीच बदलली. पन्नालाल सर विज्ञान हा विषय शिकवायचे. विज्ञान हा विषय आम्हा मुलांना तसा गुंतागुंतीचाच वाटायचा आणि होता सुद्धा. परंतु पन्नालाल सर यांची शिकवण्याची पद्धतच मुळात वेगळी होती. ते अतिशय सहज व सोप्या शब्दांमध्ये आपला विषय समजावून सांगत असत. त्यामुळे विज्ञान विषय मला अधिक आवडू लागला. मी त्या विषयात अधिक रस घेऊ लागलो. तो विषय समजून घेऊ लागलो. केवळ विज्ञान हा विषयच नाही. तर प्रत्येत विषय हा लॉजिकली समजून घेण्याची दृष्टी माझ्यात निर्माण झाली.ती आजपर्यंत कायम आहे, असे मला वाटते. आज मी एक सनदी अधिकारी म्हणून काम करतो. प्रशासनातील कामांसह शेकडो लोकं मला विविध विषय घेऊन भेटत असतात. मला अनेक विषय हाताळावे लागतात. ते समजून घेताना मला पन्नालाल सरांनी शिकवलेली पद्धत कामी येते. मी प्रत्येक विषय लॉजिकली समजून घेतो. त्याचा मला प्रशासकीय कामातही फायदाच होत आहे. त्यामुळे माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे महत्त्व कितीतरी अधिक आहे.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन