शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांना कठोर धडा शिकवा : उच्च न्यायालयाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 22:08 IST

Remedesivir black marketeers कोरोना संक्रमणाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज असताना कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून गरजूंना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांना कठोर धडा शिकवणे आवश्यक आहे अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मांडली़

ठळक मुद्देस्वत: दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज असताना कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून गरजूंना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांना कठोर धडा शिकवणे आवश्यक आहे अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मांडली़

यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे़ त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड़ ए़ हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ नागपूर पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या ३२ आरोपींना अटक केली असून त्यात डॉक्टर्सचाही समावेश आहे़ या गंभीर गुन्ह्याकडे न्यायालय मूकदर्शक होऊन पहात राहू शकत नाही़ गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी गुन्ह्यांचा तपास व खटले शेवटाला नेणे आवश्यक आहे़ त्यास अधिक विलंब होऊ नये याकरिता वेगात कारवाई करणे गरजेचे आहे़ तसेच, रेमडेसिविरचा काळाबाजार थांबविण्याकरिता प्रभावी उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले़

गुन्हेगारांविरुध्द ३ मेपर्यंत आरोपपत्र

रेमडेसिविर काळाबाजाराच्या काही प्रकरणांतील गुन्हेगारांविरुध्द येत्या ३ मेपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला दिली़ त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर ४ मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली़ तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली़ सरकारतर्फे अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली़

मागणी व वितरणात तफावत

राज्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून विदर्भातील परिस्थितीही अतिशय गंभीर झाली आहे़ उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविरची मागणी पूर्ण करणे कठीण जात आहे़ प्रशासन रेमडेसिविरचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे़ मागणी व पुरवठ्यामध्ये खूप जास्त तफावत आहे़ समाजकंटक त्याचा फायदा घेऊन गरजू व्यक्तींना रेमडेसिविरची मनमानी भावाने विक्री करीत आहेत, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले़

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय