शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: July 2, 2017 02:30 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करीत आहे.

वन महोत्सव : पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करीत आहे. नागपूर जिल्ह्यात येत्या सात दिवसांमध्ये १६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी, कॉलेज युवक - युवती, व सामाजिक संस्थांनी हिरीरीने भाग घेतला आहे. यातून पुढील तीन वर्षात हरित महाराष्ट्र घडवू, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्य राखीव पोलीस बल आणि वन विभागातर्फे शनिवारी वन महोत्सव - २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे, गिरीश गांधी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान व मुख्य वन संरक्षक संजीव गौड उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, पुढील तीन वर्षात महाराष्ट्राला हरित राज्य बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पूर्व विदर्भात आमदार अनिल सोले यांनी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात वृक्षदिंडी काढली होती तसेच गिरीश गांधी वनराईच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. घरात बालकाचा जन्म झाल्याच्या निमित्ताने एक वृक्ष लागवड करायला हवी. त्या बाळाबरोबर वृक्षाचेही संगोपन होईल. शिवाय त्या वृक्षसंगोपनाला एक भावनिक आधार राहील. परिणामी, राज्याला हरित राज्य बनविणे सहजसाध्य होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्य शासनाने निश्चित केलेले चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जनतेने जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्यावर्षी दोन कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवले होते. शिवाय यावर्षी चार कोटी आणि पुढील वर्षी २३ कोटी तसेच त्यानंतर ३३ कोटी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धन करायचे आहे. निसर्गाने मानवाला भरभरुन दिले. त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधुनिकीकरणासोबतच वसुंधरेच्या ३३ टक्के भागावर घनदाट जंगल निर्मितीचे लक्ष्य येत्या तीन वर्षात पूर्ण करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वृक्षसंवर्धन ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे. कोणतीही चळवळ ही सामाजिक चळवळ बनल्यास त्याची व्याप्ती वाढतेवत्याच्या यशस्वीतेची खात्री पटते. प्रत्येकाने एक एक वृक्ष संगोपनासाठी दत्तक घेतल्यास राज्य लवकरच बहरेल, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे व गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री भगवान यांनी केले. तर उमेशचंद्र धोटेकर यांनी आभार मानले.