शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

१६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: July 2, 2017 02:30 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करीत आहे.

वन महोत्सव : पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करीत आहे. नागपूर जिल्ह्यात येत्या सात दिवसांमध्ये १६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी, कॉलेज युवक - युवती, व सामाजिक संस्थांनी हिरीरीने भाग घेतला आहे. यातून पुढील तीन वर्षात हरित महाराष्ट्र घडवू, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्य राखीव पोलीस बल आणि वन विभागातर्फे शनिवारी वन महोत्सव - २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे, गिरीश गांधी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान व मुख्य वन संरक्षक संजीव गौड उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, पुढील तीन वर्षात महाराष्ट्राला हरित राज्य बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पूर्व विदर्भात आमदार अनिल सोले यांनी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात वृक्षदिंडी काढली होती तसेच गिरीश गांधी वनराईच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. घरात बालकाचा जन्म झाल्याच्या निमित्ताने एक वृक्ष लागवड करायला हवी. त्या बाळाबरोबर वृक्षाचेही संगोपन होईल. शिवाय त्या वृक्षसंगोपनाला एक भावनिक आधार राहील. परिणामी, राज्याला हरित राज्य बनविणे सहजसाध्य होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्य शासनाने निश्चित केलेले चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जनतेने जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्यावर्षी दोन कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवले होते. शिवाय यावर्षी चार कोटी आणि पुढील वर्षी २३ कोटी तसेच त्यानंतर ३३ कोटी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धन करायचे आहे. निसर्गाने मानवाला भरभरुन दिले. त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधुनिकीकरणासोबतच वसुंधरेच्या ३३ टक्के भागावर घनदाट जंगल निर्मितीचे लक्ष्य येत्या तीन वर्षात पूर्ण करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वृक्षसंवर्धन ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे. कोणतीही चळवळ ही सामाजिक चळवळ बनल्यास त्याची व्याप्ती वाढतेवत्याच्या यशस्वीतेची खात्री पटते. प्रत्येकाने एक एक वृक्ष संगोपनासाठी दत्तक घेतल्यास राज्य लवकरच बहरेल, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे व गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री भगवान यांनी केले. तर उमेशचंद्र धोटेकर यांनी आभार मानले.