शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

तलाठी बेमुदत संपावर

By admin | Updated: April 28, 2016 02:58 IST

तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.

प्रशासकीय कामकाज खोळंबले : विना प्रशिक्षण आॅनलाईन काम सोपविले जात असल्याने अडचणीनागपूर : तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी बुधवारी अचानक बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. आरटीई व हाऊसिंगसंबंधी कामे पूर्णत: ठप्प पडली. महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, विदर्भ पटवारी संघ आणि विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या बॅनर अंतर्गत तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनांतर्गत संप पुकारला. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविली जात असल्याने होणाऱ्या अडचणीसुद्धा या आंदोलनाचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार तलाठ्यांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे कामाचा बोझा वाढलेला आहे. त्यामुळे तलाठ्यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच कुठलेही प्रशिक्षण न देता आॅनलाईन प्रक्रियेतील कामे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांना काम करणे कठीण जात आहे. नागरिकांच्याही तक्रारी येत आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तहसील कार्यलय परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राजेश चुटे, विलास सावरकर, अतीक शेख, प्रवीण मेश्राम, अमोल सेलव, माधव वाघमारे, शरद बोरकर, गोपाल फुलुंभरकर, स्वाती सोनारकर, अलका मुळक उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुर्लक्ष केल्यानेच संप संप करण्यापूर्वी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे वेळोवेळी निवेदन दिले होते. ११ एप्रिल रोजी राज्यातील तलाठ्यांनी काम बंद करीत हातावर काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला होता. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. तेव्हा २० एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. २१ एप्रिल रोजी आॅनलाईन कामकाज प्रक्रियेला विरोध केला होता. तरीही प्रशासनाने कुठली कारवाई केली नाही. अखेर २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. तलाठ्यांनी संप मागे घ्यावा तलाठ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याबाबत शासन व प्रशासन सकारात्मक आहे. सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तलाठ्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे तलाठ्यांनी आपला संप स्थगित करून चर्चा करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले आहे.