शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तूंची विक्री होत असेल, तर यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत वजनमापे तसेच अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष वेधावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी अनेक सदस्यांनी कोरोना संसर्ग काळामध्ये मर्यादित वेळेत ग्राहकांना सामान खरेदी करायचे असल्यामुळे मनमानी दरवाढ व भेसळ केलेले पदार्थ विक्री केले जात असल्याचे ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित वैधमापन विभाग व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांनी अशा समस्यांची लेखी तक्रार, संबंधित विभागाकडे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसात तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिषदेच्या सदस्यांनी या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ चढ्या भावाने विकल्या जात असल्याबाबत तक्रारी केल्या. कृत्रिम महागाई कोरोना काळात वाढत असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या बैठका प्रत्यक्ष व्हाव्यात, सर्वांना ओळख पत्र मिळावेत, अशी विनंती देखील केली.

या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, वजनमापे विभागाचे बानाफर, अन्न व औषधी विभागाचे डॉ. पी. एम. बल्लाळ, सदस्य शामकांत पात्रीकर, रेखा भोंगाळे, मनोहर रडके, अर्चना पांडे, गणेश इनाके, रवीकांत गौतमी, कमल नामपल्लीवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मृदुला मोरे उपस्थित होते.

जुन्या व एक्सपायरी डेटच्या वस्तू विकू नये

कोविड प्रोटोकॉल पुढील काही दिवसात शिथिल होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्बंध घातलेली दुकाने, मॉल उघडण्यात येतील, यावेळी संग्रही असणाऱ्या पदार्थांची विक्री होणार नाही. या संदर्भात काळजी घ्यावी. तसेच दुकानदारांनी देखील अपायकारक ठरतील (एक्सपायरी डेट) आदी वस्तूंची विक्री करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.