शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तूंची विक्री होत असेल, तर यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत वजनमापे तसेच अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष वेधावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी अनेक सदस्यांनी कोरोना संसर्ग काळामध्ये मर्यादित वेळेत ग्राहकांना सामान खरेदी करायचे असल्यामुळे मनमानी दरवाढ व भेसळ केलेले पदार्थ विक्री केले जात असल्याचे ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित वैधमापन विभाग व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांनी अशा समस्यांची लेखी तक्रार, संबंधित विभागाकडे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसात तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिषदेच्या सदस्यांनी या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ चढ्या भावाने विकल्या जात असल्याबाबत तक्रारी केल्या. कृत्रिम महागाई कोरोना काळात वाढत असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या बैठका प्रत्यक्ष व्हाव्यात, सर्वांना ओळख पत्र मिळावेत, अशी विनंती देखील केली.

या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, वजनमापे विभागाचे बानाफर, अन्न व औषधी विभागाचे डॉ. पी. एम. बल्लाळ, सदस्य शामकांत पात्रीकर, रेखा भोंगाळे, मनोहर रडके, अर्चना पांडे, गणेश इनाके, रवीकांत गौतमी, कमल नामपल्लीवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मृदुला मोरे उपस्थित होते.

जुन्या व एक्सपायरी डेटच्या वस्तू विकू नये

कोविड प्रोटोकॉल पुढील काही दिवसात शिथिल होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्बंध घातलेली दुकाने, मॉल उघडण्यात येतील, यावेळी संग्रही असणाऱ्या पदार्थांची विक्री होणार नाही. या संदर्भात काळजी घ्यावी. तसेच दुकानदारांनी देखील अपायकारक ठरतील (एक्सपायरी डेट) आदी वस्तूंची विक्री करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.