शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे एक-दोन दिवसातच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात बदल करून एक किंवा दोन दिवसात सगळीकडील मतदान घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. वेळापत्रकात बदल करण्यासाठी मी आयोगापुढे हात जोडते, असे प्रतिपादनही ममता यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत सातत्याने निवडणूक आयोगाविरोधात भूमिका घेणाऱ्या ममता यांचा सूर कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बदलला आहे. उत्तर दिनाजपूर येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, मतदान एक किंवा जास्तीत जास्त दोन दिवसात आटोपते घेणे योग्य ठरेल. यामुळे वाढत्या संसर्गावर आळा येऊ शकतो. मात्र, उर्वरित तीन टप्पे एकत्रित घेण्याबद्दल दबावामुळे आयोग नकार देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. आयोगाने स्वतः निर्णय घ्यावे. भाजप काय म्हणत आहे त्यावर आयोगाने भूमिका ठरवू नये. मतदानाचा एक दिवस जरी वाचला तरी जनतेचे आरोग्य वाचविले जाऊ शकते, असे बॅनर्जी म्हणाल्या.

यानंतर मी किंवा पक्षाचे इतर नेते दाटीवाटीच्या भागात एकही प्रचारसभा घेणार नाहीत. मागील सहा महिन्यांत केंद्र शासनाने कुठलेही नियोजन केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.