शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे एक-दोन दिवसातच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात बदल करून एक किंवा दोन दिवसात सगळीकडील मतदान घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. वेळापत्रकात बदल करण्यासाठी मी आयोगापुढे हात जोडते, असे प्रतिपादनही ममता यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत सातत्याने निवडणूक आयोगाविरोधात भूमिका घेणाऱ्या ममता यांचा सूर कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बदलला आहे. उत्तर दिनाजपूर येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, मतदान एक किंवा जास्तीत जास्त दोन दिवसात आटोपते घेणे योग्य ठरेल. यामुळे वाढत्या संसर्गावर आळा येऊ शकतो. मात्र, उर्वरित तीन टप्पे एकत्रित घेण्याबद्दल दबावामुळे आयोग नकार देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. आयोगाने स्वतः निर्णय घ्यावे. भाजप काय म्हणत आहे त्यावर आयोगाने भूमिका ठरवू नये. मतदानाचा एक दिवस जरी वाचला तरी जनतेचे आरोग्य वाचविले जाऊ शकते, असे बॅनर्जी म्हणाल्या.

यानंतर मी किंवा पक्षाचे इतर नेते दाटीवाटीच्या भागात एकही प्रचारसभा घेणार नाहीत. मागील सहा महिन्यांत केंद्र शासनाने कुठलेही नियोजन केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.