शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

नेताजींच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करा

By admin | Updated: July 3, 2014 01:00 IST

‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या घोषणेद्वारे भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च

जनहित याचिका : हायकोर्टाची केंद्र शासनाला नोटीसनागपूर : ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या घोषणेद्वारे भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. डॉ. सुरेश पाध्ये यांनी ही याचिका दाखल केली आहे. सुभाषचंद्र बोस यांचा १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता, असे सांगण्यात येते. परंतु याबाबत मतभेद आहेत. बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता. ते भारतात परत आले होते, असा एक मतप्रवाह आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ५ एप्रिल १९५६ रोजी शाहनवाज समिती, तर ११ जुलै १९७० रोजी न्यायमूर्ती जी. डी. खोसला आयोगाची स्थापना केली होती. या दोघांच्याही अहवालातून काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. केंद्र शासनाने स्वत: हे मान्य केले होते. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १४ मे १९९९ रोजी न्यायमूर्ती मुखर्जी आयोग स्थापन करण्यात आला होता. नेताजींचा मृत्यू झाला की ते जिवंत आहेत, त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला की अन्य कोणत्या कारणांमुळे, जपान येथील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या आहेत काय, नेताजी जिवंत असल्यास कोठे आहेत, इत्यादी प्रश्नांची उकल करण्याची जबाबदारी आयोगावर होती. आयोगाने जपान, तायवान, रशिया, इंग्लंड इत्यादी देशांत जाऊन चौकशी केली. १३३ साक्षीदार व दस्तऐवज तपासले. यातून आयोगाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. कोणी म्हणाले, नेताजींचा मृत्यू दिल्लीतील लाल किल्ल्यात झाला. कोणी म्हणाले, ते विमान अपघातात मरण पावले. नेताजींचे विमान रशिया किंवा तायवान येथे कोसळल्याचे काहीच पुरावे नाहीत. रेणकोजी मंदिरातील अस्थी नेताजींच्या नसल्याचे आढळून आले आहे. कुचबिहार येथे शॉल्मरी आश्रम उभारणारे शारदानंदजी महाराज व फैजाबाद येथील गुमनामी बाबा हे नेताजी होते, असेही अनेकांचे मत आहे. परंतु त्यासंदर्भातही पुरावा मिळालेला नाही.मुखर्जी आयोगाने ७ नोव्हेंबर २००५ रोजी अहवाल सादर करून नेताजी हयात नाहीत, पण त्यांचा मृत्यू कसा झाला, हे सांगता येत नसल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. हा अहवाल शासनाने फेटाळला होता. परिणामी नेताजींच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही कायम असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.नेताजींच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्यात यावी, न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाचा अहवाल फेटाळण्याची कारणे स्पष्ट करावी व नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील सध्याची भूमिका जाहीर करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर केंद्र शासनाचे प्रधान सचिव, गृह मंत्रालय, रॉ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील के. एच. देशपांडे व अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)