शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

नेताजींच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करा

By admin | Updated: July 3, 2014 01:00 IST

‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या घोषणेद्वारे भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च

जनहित याचिका : हायकोर्टाची केंद्र शासनाला नोटीसनागपूर : ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या घोषणेद्वारे भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची नव्याने चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. डॉ. सुरेश पाध्ये यांनी ही याचिका दाखल केली आहे. सुभाषचंद्र बोस यांचा १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता, असे सांगण्यात येते. परंतु याबाबत मतभेद आहेत. बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता. ते भारतात परत आले होते, असा एक मतप्रवाह आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ५ एप्रिल १९५६ रोजी शाहनवाज समिती, तर ११ जुलै १९७० रोजी न्यायमूर्ती जी. डी. खोसला आयोगाची स्थापना केली होती. या दोघांच्याही अहवालातून काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. केंद्र शासनाने स्वत: हे मान्य केले होते. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १४ मे १९९९ रोजी न्यायमूर्ती मुखर्जी आयोग स्थापन करण्यात आला होता. नेताजींचा मृत्यू झाला की ते जिवंत आहेत, त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला की अन्य कोणत्या कारणांमुळे, जपान येथील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या आहेत काय, नेताजी जिवंत असल्यास कोठे आहेत, इत्यादी प्रश्नांची उकल करण्याची जबाबदारी आयोगावर होती. आयोगाने जपान, तायवान, रशिया, इंग्लंड इत्यादी देशांत जाऊन चौकशी केली. १३३ साक्षीदार व दस्तऐवज तपासले. यातून आयोगाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. कोणी म्हणाले, नेताजींचा मृत्यू दिल्लीतील लाल किल्ल्यात झाला. कोणी म्हणाले, ते विमान अपघातात मरण पावले. नेताजींचे विमान रशिया किंवा तायवान येथे कोसळल्याचे काहीच पुरावे नाहीत. रेणकोजी मंदिरातील अस्थी नेताजींच्या नसल्याचे आढळून आले आहे. कुचबिहार येथे शॉल्मरी आश्रम उभारणारे शारदानंदजी महाराज व फैजाबाद येथील गुमनामी बाबा हे नेताजी होते, असेही अनेकांचे मत आहे. परंतु त्यासंदर्भातही पुरावा मिळालेला नाही.मुखर्जी आयोगाने ७ नोव्हेंबर २००५ रोजी अहवाल सादर करून नेताजी हयात नाहीत, पण त्यांचा मृत्यू कसा झाला, हे सांगता येत नसल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. हा अहवाल शासनाने फेटाळला होता. परिणामी नेताजींच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही कायम असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.नेताजींच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्यात यावी, न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाचा अहवाल फेटाळण्याची कारणे स्पष्ट करावी व नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील सध्याची भूमिका जाहीर करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर केंद्र शासनाचे प्रधान सचिव, गृह मंत्रालय, रॉ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील के. एच. देशपांडे व अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)