शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

परीक्षा घेता, निकाल लावता, मग शिष्यवृत्ती का देत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST

नागपूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव ...

नागपूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. आठव्या वर्गातील विद्यार्थीच ही परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती बाराव्या वर्गापर्यंत दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा देतात आणि पात्रही ठरतात. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.

विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात फारशी जनजागृती नाही. पण राज्यभरातून किमान १ लाखावर विद्यार्थी परीक्षा देतात. दरवर्षी नागपूर जिल्ह्यात शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभर ते दीडशेच्या जवळपास असते. जिल्ह्यातील काही शाळा गरीब विद्यार्थ्यांना नियमित या परीक्षेत बसवितात आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात एका उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या शिष्यवृत्ती जबाबदारी असते. जिल्ह्यातील काही शाळा आणि पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिष्यवृत्ती का आल्या नाही, याबाबत शाळांकडून शिक्षण विभागात वारंवार विचारणा केली जाते. बरेचदा सांगितले जाते की हे काम आमच्याकडे नाही. कधी सांगितले जाते की पुण्यावरूनच आली नाही. अनेकदा शाळांवरच दोषारोप ठेवला जातो की तुम्ही मुलांचे डिटेल अपडेटच केले नाही. शाळांनी वारंवार शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांचे अपडेट दिले आहेत. पण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

- ४ वर्ष झाले शिष्यवृत्ती मिळाली नाही

अश्विनी बडवाईक या विद्यार्थिनीने आठव्या वर्गात एनएमएमएसची परीक्षा दिली. ती शिष्यवृत्तीसाठी पात्रही ठरली. आता ती बाराव्या वर्गात आहेत. पण शिष्यवृत्ती काही जमा झाली नाही. प्रियांशी साखरे ह्या विद्यार्थिनीचीही अशीच तक्रार आहे.

- तर परीक्षा कशाला घेतली

प्रतीक्षा हाडेकर या विद्यार्थिनीने २०१९ मध्ये एनएमएमएसची परीक्षा दिली आणि ती पात्रही ठरली. पण अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. शाळेला विचारणा केली तर, त्यांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले. शिक्षण विभागाने पुण्याकडे बोट दाखवून हात वर केले. शिष्यवृत्ती द्यायचीच नव्हती तर परीक्षा का घेतली, असा सवाल प्रतीक्षाने केला.

- तीन तीन वर्षापासून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गुणवंत व हुशार विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेद्वारे पात्र ठरतात. त्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे व मेहनतीचा अपमान करणे आहे. या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त १०० ते १५० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तरीही शिक्षण विभाग त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे.

- अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी