शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

By admin | Updated: April 10, 2016 03:17 IST

सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला.

मंगेश व्यवहारे नागपूरसहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला. घरातून पळून तो मुंबईत आला होता. रेल्वेस्थानकावरील मुलांसोबत राहून व्यसनांच्या आहारी गेला होता. या मुलाला नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणण्यात आले. अंगावर मळकट फाटके कपडे, केस विसकटलेले, बालपणीच आयुष्य हरविल्यागत तो होता. प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरमध्ये त्याच्यावर अध्ययनाबरोबर आचार-विचारांचे संस्कार झाले. आपल्या आयुष्याची सहा वर्ष त्याने येथे घालविली. येथे तो स्वत:च्या आयुष्याबद्दल जबाबदार झाला. शिक्षण घेऊन सुसंस्कृत झाला. एक जबाबदार, संवेदनशील नागरिक म्हणून तो आज आपल्या घराकडे परतला आहे. जे संस्कार आई-वडिलांनी त्याच्यावर करायचे होते, ते प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातून त्याच्यावर झाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. झारखंड येथील रहिवासी अर्जुन चौधरी असे त्याचे नाव. ११ वर्षाचा असताना अर्जुनने घरातून १०० रुपये घेऊन पळ काढला होता. मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर मुलांसोबत भटकत असताना तो समतोल फाऊंडेशनला सापडला. फाऊंडेशनने त्याला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणले. अतिशय जिद्दी आणि चिडखोर स्वभावाच्या अर्जुनला कशाचीही भ्रांत नव्हती. शिक्षणात तर त्याचे मनच रमत नव्हते. व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता ढासळलेली होती. आई-वडिलांबद्दल त्याची तसूभरही आस्था नव्हती. अशा अवस्थेत प्लॅटफॉर्म शाळेने त्याला सांभाळले. त्याची मानसिकता बदलविण्यासाठी समुपदेशन केले. त्याच्यावर आचार-विचारांचे संस्कार केले. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला खेळाकडे प्रवृत्त केले. हळूहळू तो इतर मुलांमध्ये रमला. त्याचे बोलणे, राहणे, वागणे यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्यातील होत असलेले बदल लक्षात घेऊन, त्याला भविष्याची समज दिली. अध्ययनाकडे त्याच्यात आवड निर्माण केली. त्याला शाळेत दाखला मिळवून दिला. हळूहळू त्याच्या स्वभावात परिवर्तन झाले. तो नियमित शाळेत जायला लागला, अभ्यास करायला लागला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. अर्जुन आज अकरावीत शिकतो आहे. आज तो जबाबदार, संस्कारीत झाला आहे. सहा वर्षे तो शाळेत शिकत असताना ज्ञानमंदिराच्या प्रकल्प प्रमुखांनी त्याच्या आई-वडिलांशी त्याची भेट करून दिली. अर्जुन लहानपणापासून त्याच्या मोठ्या वडिलांकडे राहत होता. त्यांचा थकता काळ असल्याने, अर्जुनला त्यांनी परत गावी बोलाविले आहे. अर्जुनलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. यापुढे आईवडिलांचा भविष्याचा आधार बनण्याचा संकल्प करून तो शनिवारी