शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

विद्यार्थ्यांकडून वय व दुचाकीचे प्रतिज्ञापत्र घ्या; शिकवणी वर्गांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 11:59 IST

शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्देशिकवणी वर्ग संचालकांची जबाबदारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. या आदेशामुळे शिकवणी वर्गांची जबाबदारी वाढली आहे.अल्पवयीनांना ५० सीसीवरील दुचाकी चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाकी चालवीत आहेत. २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलाने शक्तिशाली दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुसऱ्याचा अपघात केला होता. न्यायालयाने त्या घटनेची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली. ही याचिका बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला.याशिवाय न्यायालयाने शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी व अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीला फटकारले. समिती बैठका घेऊन समस्या सोडविण्यावर विविध निर्णय घेते, पण त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. निर्णय कागदावरच राहतात, असे मत न्यायालयाने व्यक्त करून आतापर्यंतच्या बैठकांमध्ये सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर सहा आठवड्यांत अंमलबजावणी करण्याचा आदेश उपसमितीला दिला. न्यायालयाने अन्य एका प्रकरणात शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्या समितीने स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय