शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

५०० रुपये घ्या अन् व्यवसाय करा !

By admin | Updated: February 12, 2015 02:11 IST

आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, ...

लोकमत विशेषआनंद डेकाटे नागपूर आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार योजनेखाली महिलांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते ३० वर्षांपूर्वी मिळणारे ५०० रुपयाचे अनुदान आजही तितकेच असून, त्यात एक रुपयाचीही वाढ झाली नाही. परिणामी या योजनेसाठी अर्ज करणेच बंद झाले असून योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबविलेल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे स्वयंरोजगाराची योजना होय. या योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत अनुदान दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना खाद्यपदार्थ तयार करून विकणे, मण्यांच्या वस्तू विकणे, भाजीपाला व फळे विकणे आदी व्यवसाय करण्यासाठी मदत म्हणून शासनातर्फे ५०० रुपये अनुदान दिले जाते. अनुदान वाढीची मागणी शासन दरबारी पडून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणारे ५०० रुपयांचे अनुदान हे १९८५ च्या निकषानुसार आहेत. ३० वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे आज ५०० रुपयात व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भातील निकष बदलून अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस महिला व बाल विकास विभागातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु शासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.