शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

५०० रुपये घ्या अन् व्यवसाय करा !

By admin | Updated: February 12, 2015 02:11 IST

आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, ...

लोकमत विशेषआनंद डेकाटे नागपूर आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार योजनेखाली महिलांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते ३० वर्षांपूर्वी मिळणारे ५०० रुपयाचे अनुदान आजही तितकेच असून, त्यात एक रुपयाचीही वाढ झाली नाही. परिणामी या योजनेसाठी अर्ज करणेच बंद झाले असून योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबविलेल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे स्वयंरोजगाराची योजना होय. या योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत अनुदान दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना खाद्यपदार्थ तयार करून विकणे, मण्यांच्या वस्तू विकणे, भाजीपाला व फळे विकणे आदी व्यवसाय करण्यासाठी मदत म्हणून शासनातर्फे ५०० रुपये अनुदान दिले जाते. अनुदान वाढीची मागणी शासन दरबारी पडून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणारे ५०० रुपयांचे अनुदान हे १९८५ च्या निकषानुसार आहेत. ३० वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे आज ५०० रुपयात व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भातील निकष बदलून अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस महिला व बाल विकास विभागातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु शासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.