शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मिठाई, मेव्याच्या बाजारात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:48 IST

दिवाळी जवळ आलेली असताना एकमेकांना शुभेच्छा देण्याशिवाय भेटवस्तू देणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देदिवाळीनिमित्त वाढली पसंती : परराज्यातूनही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी जवळ आलेली असताना एकमेकांना शुभेच्छा देण्याशिवाय भेटवस्तू देणे सुरू झाले आहे. आपल्या बजेटमध्ये चांगली भेटवस्तू देण्यासाठी नागरिक मिठाई, मेव्यांना पसंतीक्रम देत आहेत. बाजारात मिठाई, मेव्याची मागणी पाहता आकर्षक पॅकिंगमध्ये वजन आणि किमतीच्या आधारे त्यांना तयार करण्यात येत आहे. माता लक्ष्मी, श्रीगणेश, स्वस्तिक, ओम आदी डिझाईनचे बॉक्स तयार करून त्यात मिठाई, मेवा सुंदर पद्धतीने सजवून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात जवळपास १८० दुकाने आहेत. येथे पॅकिंगमध्ये मिठाई उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूरशिवाय विदर्भ, मराठवाडा, खान्देश, छत्तीसगड, मध्य प्रदेशातही त्याला विशेष मागणी आहे. दिल्ली, मुंबई, इराक-इराणमधूनही शहरातून मिठाई मागविण्यात येत आहे.२०० ते ३ हजारापर्यंत आहेत किमतीग्राहकांची मागणी पाहून २०० ग्रॅम ते २ किलोपर्यंतचे मिठाईचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिठाईच्या किमतीही वजनाशी मिळत्याजुळत्या आहेत. मिठाईच्या दुकानात हे बॉक्स २०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, किसमिस, ताल मखाना, जर्दाळू, पिस्ता आदींचा समावेश आहे.नागरिकांची वाढतेय मागणीदिवाळीच्या उत्साहात प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देतो. शुभेच्छांसोबत भेटवस्तू देण्याचीही परंपरा आहे. अनेक नागरिक असे आहेत जे दुसºया शहरात राहणाºया आपल्या चाहत्यांना भेटवस्तू पाठवू इच्छितात. मिठाईच्या तुलनेत मेवा सहा महिन्यापर्यंत टीकत असल्यामुळे अनेक नागरिक त्याला पसंती देत आहेत, असे व्यावसायिक अतुल कोटेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.