शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सागरी संसाधनांचा शाश्वत वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे व जागतिक उष्णतामानामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील व समुद्राच्या पातळीत वाढ झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे व जागतिक उष्णतामानामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील व समुद्राच्या पातळीत वाढ झालेली आहे. तसेच सागरी वसतिस्थाने व संसाधनांत घट झालेली आहे. यामुळे मत्स्य संसाधनेच धोक्यात आलेली नसून या व्यवसायातील मच्छिमारांची उपजीविकादेखील धोक्यात आलेली आहे. सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करणे अत्यावश्यक आहे, असे मत कोची येथील केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. ग्रीनसन जॉर्ज यांनी व्यक्त केले. जागतिक महासागर दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादादरम्यान ते बोलत होते.

“आपले महासागर तापदायक बनत आहे काय? भारतीय महासागर संबंधी दृष्टिकोन" सदर विषयावर डॉ. ग्रीनसन जॉर्ज यांनी मार्गदर्शन केले.

मत्स्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी परिसंवादाचे आयोजन करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. मानवी उपक्रमाचा समुद्रावर होणारा परिणाम व जागतिक महासागराच्या शाश्वत व्यवस्थापनाची गरज याविषयी माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.डब्ल्यू. बोंडे, डॉ. प्रशांत तेलवेकर, राजीव राठोड व शैलेंद्र रेळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.