शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

पीएफ जमा करण्याच्या आदेशावर स्थगिती

By admin | Updated: November 5, 2016 02:59 IST

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता.

मनपाला हायकोर्टाचा दिलासा : सक्तीची कारवाई करण्यास मनाईनागपूर : प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी या वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली. तसेच पुढील तारखेपर्यंत मनपाच्या खात्यातून संबंधित रक्कम स्थानांतरित करण्याबाबत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर अवकाशकालीन न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४,५०० सफाई कर्मचाऱ्यांचा जानेवारी -२०११ ते आॅगस्ट-२०१३ या कालावधीतील १५ कोटी ६७ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी महानगरपालिकेकडे थकीत आहे, असे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांचे म्हणणे आहे. यामुळे वादग्रस्त आदेश जारी करून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले होते.महानगरपालिकेत बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत मनपाचे खाते आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कार्यालयात बोलावले होते. यामुळे बँकेतील खाते गोठवून संबंधित रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात स्थानांतरित केली जाण्याची शक्यता पाहता मनपाने उच्च न्यायालयात दाद मागितली. प्रकरणावर दिवाळीच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी होईल. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)असे आहे प्रकरणमनपातील अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ सालापासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करणे आवश्यक होते. परंतु, मनपाने २०१३ पासून योजना लागू करण्याची भूमिका घेऊन जानेवारी-२०११ पासून भविष्य निर्वाह निधी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने यापूर्वीही मनपाची बँक खाती गोठविली होती. त्यावेळी अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ पासून योजना लागू करण्याची ग्वाही मनपातर्फे देण्यात आली होती. मनपाने ही ग्वाही पाळली नाही. परिणामी गेल्या बुधवारी वादग्रस्त आदेश जारी करण्यात आला.मनपाची आर्थिक परिस्थिती खराबराज्य शासनाने एलबीटी रद्द केला आहे. परंतु, या मोबदल्यात मनपाला शासनाकडून अपेक्षित अनुदान प्राप्त होत नाही. यामुळे मनपाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. याचा विकास कामांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा न करण्याचेही हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.