शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पीएफ जमा करण्याच्या आदेशावर स्थगिती

By admin | Updated: November 5, 2016 02:59 IST

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता.

मनपाला हायकोर्टाचा दिलासा : सक्तीची कारवाई करण्यास मनाईनागपूर : प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी या वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली. तसेच पुढील तारखेपर्यंत मनपाच्या खात्यातून संबंधित रक्कम स्थानांतरित करण्याबाबत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर अवकाशकालीन न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४,५०० सफाई कर्मचाऱ्यांचा जानेवारी -२०११ ते आॅगस्ट-२०१३ या कालावधीतील १५ कोटी ६७ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी महानगरपालिकेकडे थकीत आहे, असे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांचे म्हणणे आहे. यामुळे वादग्रस्त आदेश जारी करून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले होते.महानगरपालिकेत बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत मनपाचे खाते आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कार्यालयात बोलावले होते. यामुळे बँकेतील खाते गोठवून संबंधित रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात स्थानांतरित केली जाण्याची शक्यता पाहता मनपाने उच्च न्यायालयात दाद मागितली. प्रकरणावर दिवाळीच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी होईल. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)असे आहे प्रकरणमनपातील अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ सालापासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करणे आवश्यक होते. परंतु, मनपाने २०१३ पासून योजना लागू करण्याची भूमिका घेऊन जानेवारी-२०११ पासून भविष्य निर्वाह निधी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने यापूर्वीही मनपाची बँक खाती गोठविली होती. त्यावेळी अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ पासून योजना लागू करण्याची ग्वाही मनपातर्फे देण्यात आली होती. मनपाने ही ग्वाही पाळली नाही. परिणामी गेल्या बुधवारी वादग्रस्त आदेश जारी करण्यात आला.मनपाची आर्थिक परिस्थिती खराबराज्य शासनाने एलबीटी रद्द केला आहे. परंतु, या मोबदल्यात मनपाला शासनाकडून अपेक्षित अनुदान प्राप्त होत नाही. यामुळे मनपाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. याचा विकास कामांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा न करण्याचेही हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.