शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहन चालविल्यास परवाना निलंबित

By admin | Updated: May 13, 2016 03:20 IST

आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत.

परिवहन आयुक्तांचे निर्देश : तीन महिन्यांपर्यंत कारवाईचे निर्देशनागपूर : आता दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा लाल सिग्नल तोडणे आदी प्रकार वाहनचालकांना चांगलेच महागडे पडणार आहेत. परिवहन आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून, तीन महिन्यांपर्यंत दोषी वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाही तर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलिसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये सामूहिकपणे वाहनचालक सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. गेल्या वर्षी वाहतुकीची पायमल्ली करणाऱ्या सुमारे १०८७ वाहनचालकांचा परवाना वाहतूक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाठविले. मात्र, यातील २९७ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणे व इतरांवर ६० दिवसांचे निलंबन करण्यात आले. असे असतानाही वाहतूक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. याची दखल परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतली. गंभीर वाहतूक गुन्ह्यासंदर्भात उदा. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लाल सिग्नल तोडणे आदी गुन्ह्यांसाठी वाहन चालविणाऱ्याचा वाहन परवाना कमीतकमी तीन महिने कालावधीसाठी निलंबित करण्याबाबत निर्देश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) दिले आहे. (प्रतिनिधी)विशेष तपासणी मोहीम सुरूवाढत्या वाहतूक गुन्ह्यांसंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचेही निर्देश परिवहन कार्यालयांनी दिले आहेत. यात वेगळे पथक तयार करून पोलिसांची मदत घेऊन ही मोहीम राबविण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दोषी प्रकरणात परवाना निलंबित करण्याचे अधिकार परिवहन विभागास आहे. यामुळे पोलीस विभागाकडून जी प्रकरणे या संबंधित कारवाईसाठी परिवहन विभागाकडे दिली जातील त्या सर्व प्रकरणात मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९, केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम २१ नुसार वाहनचालकाचा परवाना कमीतकमी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे पत्रात म्हटले आहे. ही मोहीम ९ ते २१ मे या दरम्यान राबविण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.अपुऱ्या मनुष्यबळात कशी होणार मोहीम यशस्वीशहर, ग्रामीण आरटीओ कार्यालय व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या निरीक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक निरीक्षक सुट्यांवर तर काही अद्यापही रुजू झालेले नाहीत. कामाचा ताण व उन्हाच्या तडाक्यामुळे काही निरीक्षक वैद्यकीय रजेवर आहेत. आहे त्या निरीक्षकांच्या भरवशावर रोजची कामे व खासगी बसेस तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. आता यात या नव्या मोहिमेची भर पडल्याने मोहिमेच्या यशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.