शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

पोलिसांच्या रात्रगस्तीला चोरट्यांचा सुरुंग

By admin | Updated: May 7, 2014 02:03 IST

एकेकाळी संघटित गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळात मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आलेख प्रचंड वाढला आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दरदिवशी कुठे ना कुठे मोठी घरफोडी, वाटमारी हे गुन्हे घडत आहे.

 नागरिकांची मालमत्ता धोक्यात

 क्राईम रेट वाढला, डिटेक्शन मात्र झिरो, पोलीस आहेत कुठे ?

यवतमाळ : एकेकाळी संघटित गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळात मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आलेख प्रचंड वाढला आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दरदिवशी कुठे ना कुठे मोठी घरफोडी, वाटमारी हे गुन्हे घडत आहे. असे गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा फेल ठरली असून घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावण्यातही पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाही. पोलिसांची रात्रगस्त, फिक्स पॉर्इंट छेदून गुन्हे घडत असल्याने पोलीस यंत्रणा नेमकी आहे कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यवतमाळ शहरातील प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांचा क्राईम रेट प्रचंड वाढला आहे. घरफोडीची तक्रार वडगाव रोड आणि यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आली नाही असा एकही दिवस गेल्या तीन महिन्यात उजाडलेला नाही. त्यातही मोठ्या घरफोड्यांचीच संख्या अधिक आहे.

एक लाखांपासून दहा लाखापर्यंतचा ऐवज चोरटे लंपास करीत आहे. पोलिसांच्या कथित रात्रगस्त, फिक्स पॉर्इंट, चार्ली कमांडोला सुरुंग लावून चोरटे आपले काम फत्ते करीत आहेत. गेल्या तीन महिन्यात पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून घरफोड्या करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

यवतमाळकर एवढे सुस्त का ?

चोरटे घर लुटून नेत आहेत, त्यांना पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. त्यानंतरही यवतमाळकर नागरिक सुस्त का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांच्या संपत्तीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना ‘तुम्ही रात्रभर नेमकी कुठे गस्त केली’ असा जाब विचारण्याची आवश्यकता असताना नागरिक घराबाहेर निघत नसल्याने, पोलीस ठाण्यांवर धडकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वीज-पाणी मिळत नाही म्हणून अधिकार्‍यांना डांबून ठेवणारे यवतमाळकर आपली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेल्यानंतरही पोलिसांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत, हे कोडे गुलदस्त्यात आहे.

पोलिसांचा महिनाभरानंतर ‘कळसा गावाला वळसा’

दिग्रस तालुक्याच्या कळसा गावात महिनाभरापूर्वी दीड लाख रुपयांचा दरोडा पडला. पोलिसांनी अन्य प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही थंडबस्त्यात ठेवले. मात्र उच्च न्यायालय आणि महिला आयोगाकडून थेट अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे व तेथून यवतमाळात ‘दट्ट्या’ येताच पोलिसांनी या एकाच घटनेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले. या गावात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांनी तेथे तळ (कॅम्प) ठोकला आहे. एकीकडे दीड लाखाच्या चोरीसाठी पोलीस प्रशासन (महिनाभराने का होईना) प्रचंड तत्परता दाखवत असताना दुसरीकडे यवतमाळ शहर व अन्य भागात चोरटे भरदिवसा रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेत आहे. मात्र कळसा प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय पोलीस सध्या तरी अन्य घटनांची पर्वा करणार नाहीत, असे दिसते.