शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

उमरेड विभागातील नुकसानीचे सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : सातत्याने पडणाऱ्या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : सातत्याने पडणाऱ्या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरमधील सोयाबीनला बुरशी लागली असून, सोयाबीनच्या शेंगावर डाग पडत आहेत, शिवाय कोंब येण्याच्या मार्गावर असून, सततच्या पावसामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेत, उमरेड विभागातील पिकांचे सर्वेक्षण करावे आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी, तसेच सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्यामार्फत कृषिमंत्री, तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले.

यापूर्वीही नदी-नाल्यांच्या काठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळीही सर्वेक्षण करण्यात आले नाही. आता निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक नेस्तनाबूत होत आहे. आधीच मागील अनेक वर्षांपासून नापिकीचे संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले असून, कोरोनामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या समस्येला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ कर्जमाफीची घोषणा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अश्विन उके, राजेश हजारे, शिवदास कुकडकर, महेश मरघडे, पुरुषाेत्तम बचाले, मधुकर सातपुते, घनश्याम हाडके आदींच्या शिष्टमंडळाने या समस्येकडे लक्ष वेधले आहे.