शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समरसतेबाबत संघाचे देशपातळीवर सर्वेक्षण

By admin | Updated: October 17, 2016 02:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे.

मंदिर, पाणवठे, स्मशानभूमीवरील भेदभाव शोधणार : सर्वेक्षणाच्या आधारावर उपाययोजना करणारयोगेश पांडे  नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील काही काळापासून सामाजिक समरसतेबाबत सक्रिय पुढाकार घेतला आहे. देशात सामाजिक समतेबाबत प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याबाबत संघातर्फे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर गावागावांमधील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमीवरील भेदभाव मिटविण्यासाठी संघ स्वयंसेवकांकडून उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देश तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगती करत असला तरी प्रत्येक गावात जातीगत भेदभाव दिसून येतो हे कटू सत्य आहे. यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये नागपुरात झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर संघातर्फे विविध पातळ्यांवर काम सुरू झाले. सरसंघचालकांनीदेखील समाजात भेदभाव असून त्याला दूर करण्याची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी प्रतिपादन केले. दरम्यानच्या काळात गोमांसबंदी, गोरक्षा इत्यादी मुद्यांमुळे संघ व संघप्रणित संघटनांवर जोरदार टीका झाली.दरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याअगोदर देशातील खरी स्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत होते. देशभरात संघाचे ४२ प्रांत आहेत. यातील बहुतांश प्रातांमध्ये गावागावांमधील भेदभाव जाणून घेण्यासंदर्भात सर्वेक्षण सुरू झाले. यात प्रामुख्याने गावांतील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमी येथे जाती पंथांच्या आधारावर भेदभाव आहे का, सामाजिक समरसतेचे प्रमाण किती आहे इत्यादी मुद्यांच्या आधारावर सर्वेक्षण सुरू आहे. काही प्रातांमधील सर्वेक्षणाचे अहवाल संघ मुख्यालयाला सादरदेखील झाले असून त्यातील आकडे धक्कादायक आहेत.गाव-मोहल्ला पातळीवर संघाचा भरयाबाबत संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता, त्यांनी असे सर्वेक्षण सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सामाजिक समरसता केवळ भाषणांमधून येणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. सत्यस्थिती जाणून घेतल्याशिवाय प्रभावी कृती करणे उपयोगाचे ठरणार नाही. त्यामुळे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे तर काही ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. समाजात एकता राहावी, भेदभाव नष्ट व्हावा ही संघाची भूमिका आहे. सर्वेक्षणाच्या आधारावर प्रांतस्तरांवर स्वयंसेवकच आपापल्या परीने सामाजिक समरसता दृढ करण्यासाठी उपाययोजना करतील, असे जे. नंदकुमार यांनी स्पष्ट केले. गाव-मोहल्ला पातळीवरून भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरुवात झाली तर आपोआपच सामाजिक समरसता वाढत जाईल. त्यामुळे स्वयंसेवकांचा भर याकडेच आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.