शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

सामाजिक समरसतेबाबत संघाचे देशपातळीवर सर्वेक्षण

By admin | Updated: October 17, 2016 02:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे.

मंदिर, पाणवठे, स्मशानभूमीवरील भेदभाव शोधणार : सर्वेक्षणाच्या आधारावर उपाययोजना करणारयोगेश पांडे  नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असल्याचा समाजात सर्वसाधारण समज आहे. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील काही काळापासून सामाजिक समरसतेबाबत सक्रिय पुढाकार घेतला आहे. देशात सामाजिक समतेबाबत प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याबाबत संघातर्फे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर गावागावांमधील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमीवरील भेदभाव मिटविण्यासाठी संघ स्वयंसेवकांकडून उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देश तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगती करत असला तरी प्रत्येक गावात जातीगत भेदभाव दिसून येतो हे कटू सत्य आहे. यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये नागपुरात झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर संघातर्फे विविध पातळ्यांवर काम सुरू झाले. सरसंघचालकांनीदेखील समाजात भेदभाव असून त्याला दूर करण्याची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी प्रतिपादन केले. दरम्यानच्या काळात गोमांसबंदी, गोरक्षा इत्यादी मुद्यांमुळे संघ व संघप्रणित संघटनांवर जोरदार टीका झाली.दरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याअगोदर देशातील खरी स्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत होते. देशभरात संघाचे ४२ प्रांत आहेत. यातील बहुतांश प्रातांमध्ये गावागावांमधील भेदभाव जाणून घेण्यासंदर्भात सर्वेक्षण सुरू झाले. यात प्रामुख्याने गावांतील मंदिरे, पाणवठे व स्मशानभूमी येथे जाती पंथांच्या आधारावर भेदभाव आहे का, सामाजिक समरसतेचे प्रमाण किती आहे इत्यादी मुद्यांच्या आधारावर सर्वेक्षण सुरू आहे. काही प्रातांमधील सर्वेक्षणाचे अहवाल संघ मुख्यालयाला सादरदेखील झाले असून त्यातील आकडे धक्कादायक आहेत.गाव-मोहल्ला पातळीवर संघाचा भरयाबाबत संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता, त्यांनी असे सर्वेक्षण सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सामाजिक समरसता केवळ भाषणांमधून येणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. सत्यस्थिती जाणून घेतल्याशिवाय प्रभावी कृती करणे उपयोगाचे ठरणार नाही. त्यामुळे विविध प्रातांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे तर काही ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. समाजात एकता राहावी, भेदभाव नष्ट व्हावा ही संघाची भूमिका आहे. सर्वेक्षणाच्या आधारावर प्रांतस्तरांवर स्वयंसेवकच आपापल्या परीने सामाजिक समरसता दृढ करण्यासाठी उपाययोजना करतील, असे जे. नंदकुमार यांनी स्पष्ट केले. गाव-मोहल्ला पातळीवरून भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरुवात झाली तर आपोआपच सामाजिक समरसता वाढत जाईल. त्यामुळे स्वयंसेवकांचा भर याकडेच आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.