शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ दक्षता पथकावर रेतीमाफियांची पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST

जगदीश जोशी नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून ...

जगदीश जोशी

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून आहे. परंतु, त्यांना अद्याप समाधानकारक यश मिळाले नाही. हे पथक सिव्हिल लाईन्स येथील रविभवनमध्ये थांबले आहे. रेतीमाफियांनी या पथकावर सतत लक्ष ठेवण्यासाठी आठ तरुणांना तैनात केले आहे. ते तरुण दक्षता पथकाचा सावलीसारखा पाठलाग करतात व रेतीमाफियांना पथक कुठे आहे, काय करीत आहे, इत्यादी माहिती देतात. त्यामुळे रेतीमाफिया स्वत:ला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.

आरटीओमधील भ्रष्टाचार नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीड वर्षापूर्वी केवळ तीन वर्षे सेवा झालेल्या उपनिरीक्षकाकडे दीड कोटी रुपयाची अपसंपदा आढळून आली होती. त्यानंतरही अनेक आरटीओ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारासाठी कारवाई करण्यात आली. आठ महिन्यापूर्वी ओव्हरलोड वाहनांकडून लाच वसुलीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांचे दोन गट तयार झाले होते. एका गटाने दुसऱ्या गटाविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचले होते. परंतु, ओव्हरलोड वाहतूक थांबली नाही. यासंदर्भात काही पीडित नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. गडकरी यांनी २२ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिव संजीवकुमार यांना पत्र लिहून आरटीओमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास सांगितले होते. दरम्यान, शहर पोलिसांनी रेतीमाफियांवर कारवाई मोहीम राबवून खळबळ उडवून दिली. त्यामुळे रेतीमाफिया ग्रामीण व अन्य भागाकडे वळले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी परिवहन सचिव अविनाश ढाकणे भ्रष्टाचाराची माहिती घेण्यासाठी नागपुरात आले होते. त्यांच्या आदेशामुळे परिस्थिती बदलली नाही. परिणामी, दक्षता पथकाला पाठविण्यात आले. परंतु, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या पथकाच्या आगमनाची माहिती फोडून रेतीमाफियांना सतर्क केले. रेतीमाफियांनी लगेच रणनीतीमध्ये बदल केला. यासंदर्भात पथकाचे प्रमुख अविनाश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

------------------

नायक झाला खलनायक

ओव्हरलोड वाहतुकीचा नायक सत्य पुढे आणण्यासाठी प्रयत्नरत व्यक्तींमध्ये खलनायक झाला आहे. संबंधित नायकाला तीन वर्षापूर्वी अमरावती एसीबीने लाखो रुपयासह पकडले होते. तो नांदेडमधील अधिकाऱ्याच्या मदतीने ओव्हरलोडचे रॅकेट संचालित करीत होता. आधी हे काम करणाऱ्या अधिकाऱ्याने व्हीआरएस घेतली आहे.