शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अनलॉकनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत आश्चर्यजनक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:11 IST

नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनलॉकनंतर देशातील उद्योगधंदे पूर्वस्थितीत येत असून, देशांतर्गत निर्मित वस्तूंची मागणी वाढली आहे. ...

नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनलॉकनंतर देशातील उद्योगधंदे पूर्वस्थितीत येत असून, देशांतर्गत निर्मित वस्तूंची मागणी वाढली आहे. त्याचा ऑटोमोबाइलसह सर्वच क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. शिवाय जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थात देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. वर्तमानस्थितीत देशात अनलॉकनंतर अर्थव्यवस्थेत आश्चर्यजनक वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय अध्यक्ष सीए मनीष गढिया यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी नागपुरातील ५०० पेक्षा जास्त सीएंशी चर्चा केली. नागपूर सीए शाखेच्या धंतोली येथील सभागृहात त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मनीष गढिया म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था आता मंदीच्या सावटातून बाहेर निघत आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सावधतेने पाऊल उचलत असून, उद्योजक व व्यावसायिकांनाही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था आणि एमएसएमईच्या विकासात सीएंची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया, उपाध्यक्ष सीए जितेन सागलानी आणि कोषाध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने उपस्थित होते.