शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आदिवासी मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणारे ‘सरजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणे हेच त्यांचे जणू व्रत. बँकेची चांगली नोकरी सोडली, शहरातील सर्व सुखांचा त्याग केला अन् काही वर्षांअगोदर थेट नर्मदाकाठी असलेला इंजिनियर भूमचैतन्य बाबांचा आश्रम गाठला. गुरुची सेवा करणे हेच ध्येय अन् त्यातूनच निर्माण झालेली त्यांची ‘सरजी’ ही ओळख. आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणे हेच मिशन डोळ्यासमोर ठेवून अक्षरश: त्यासाठी झोकून काम करणाऱ्या विजय शेटे यांनी समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करत असताना अ‍ॅथ्लेटिक्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक भाऊ काणे यांचे मार्गदर्शन लाभले अन् विजय शेटे यांना पदवी शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात ते मध्य प्रदेशातील मंडलाजवळील इंजिनियर भूमचैतन्य बाबांच्या आश्रमाशी जुळले. दोघेही विजय शेटे यांना गुरुस्थानीच होते व अध्यात्मात त्यांना समाधान लाभत होते. समाजासाठी काहीतरी करायचे या विचारातून शेटे यांनी निवृत्तीच्या सहा वर्षाअगोदरच सेवानिवृत्ती घेतली अन् आश्रमासाठी सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली.

आश्रमात २०१५ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानोदय विद्यामंदिर ही शाळा सुरू करण्यात आली होती व २०१८ साली शेटे यांच्याकडे शाळेची जबाबदारी आली. अगोदर शिकविण्याचा अनुभव नसला तरी आदिवासी विद्यार्थ्यांशी ते एकरूप झाले होते. या मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटली पाहिजे व त्यांना सुविधा मिळायला हव्या या जिद्दीतून त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शाळेसाठी इमारतदेखील उभारली व आजच्या तारखेत तेथे ९० हून अधिक आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. दुर्गम भागात संगणकाचीदेखील ओळख ते करुन देत आहेत. विशेष म्हणजे त्यातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठीदेखील निवड झाली आहे. या मुलांना पाचवीहून पुढे शिक्षणासाठी वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

गुरुंचीच प्रेरणा अन् त्यांचेच आशीर्वाद

विजय शेटे यांना सर्व जण ‘सरजी’ म्हणून ओळखतात. सर्वसामान्य व्यक्ती दोन दिवसाहून अधिक काळ पाड्यांमध्ये राहू शकत नाही. विजय शेटे यांनी मात्र सुखवस्तू आयुष्याच्या त्याग तर केलाच शिवाय तेथील मुलांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणायला सुरुवात केली. आश्रमाने माझ्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले. माझ्या गुरुंनी माझ्यावर जे संस्कार केले त्यातूनच मला प्रेरणा व दिशा मिळते. त्यातूनच आदिवासी मुलांसाठी काम करण्याचे बळ मिळत आहे, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.