शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणारे ‘सरजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या मुलांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणे हेच त्यांचे जणू व्रत. बँकेची चांगली नोकरी सोडली, शहरातील सर्व सुखांचा त्याग केला अन् काही वर्षांअगोदर थेट नर्मदाकाठी असलेला इंजिनियर भूमचैतन्य बाबांचा आश्रम गाठला. गुरुची सेवा करणे हेच ध्येय अन् त्यातूनच निर्माण झालेली त्यांची ‘सरजी’ ही ओळख. आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटविणे हेच मिशन डोळ्यासमोर ठेवून अक्षरश: त्यासाठी झोकून काम करणाऱ्या विजय शेटे यांनी समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करत असताना अ‍ॅथ्लेटिक्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक भाऊ काणे यांचे मार्गदर्शन लाभले अन् विजय शेटे यांना पदवी शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात ते मध्य प्रदेशातील मंडलाजवळील इंजिनियर भूमचैतन्य बाबांच्या आश्रमाशी जुळले. दोघेही विजय शेटे यांना गुरुस्थानीच होते व अध्यात्मात त्यांना समाधान लाभत होते. समाजासाठी काहीतरी करायचे या विचारातून शेटे यांनी निवृत्तीच्या सहा वर्षाअगोदरच सेवानिवृत्ती घेतली अन् आश्रमासाठी सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली.

आश्रमात २०१५ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानोदय विद्यामंदिर ही शाळा सुरू करण्यात आली होती व २०१८ साली शेटे यांच्याकडे शाळेची जबाबदारी आली. अगोदर शिकविण्याचा अनुभव नसला तरी आदिवासी विद्यार्थ्यांशी ते एकरूप झाले होते. या मुलांमध्ये विद्येची ज्योत पेटली पाहिजे व त्यांना सुविधा मिळायला हव्या या जिद्दीतून त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शाळेसाठी इमारतदेखील उभारली व आजच्या तारखेत तेथे ९० हून अधिक आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. दुर्गम भागात संगणकाचीदेखील ओळख ते करुन देत आहेत. विशेष म्हणजे त्यातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठीदेखील निवड झाली आहे. या मुलांना पाचवीहून पुढे शिक्षणासाठी वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

गुरुंचीच प्रेरणा अन् त्यांचेच आशीर्वाद

विजय शेटे यांना सर्व जण ‘सरजी’ म्हणून ओळखतात. सर्वसामान्य व्यक्ती दोन दिवसाहून अधिक काळ पाड्यांमध्ये राहू शकत नाही. विजय शेटे यांनी मात्र सुखवस्तू आयुष्याच्या त्याग तर केलाच शिवाय तेथील मुलांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणायला सुरुवात केली. आश्रमाने माझ्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले. माझ्या गुरुंनी माझ्यावर जे संस्कार केले त्यातूनच मला प्रेरणा व दिशा मिळते. त्यातूनच आदिवासी मुलांसाठी काम करण्याचे बळ मिळत आहे, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.