शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

है तय्यार हम!

By admin | Updated: September 30, 2016 03:16 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत वेगळाच उत्साह दिसून येत आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक’चे उपराजधानीत स्वागतपाकिस्तानला दणका आवश्यकच होता मंगेश व्यवहारे  नागपूरपाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत वेगळाच उत्साह दिसून येत आहे. भारतीय सैन्यदलात सेवा देऊन चुकलेले व अखेरपर्यंत सैनिक म्हणूनच जगण्याचा संकल्प घेतलेले सुधाकर मोरे यांचा उत्साहदेखील अवर्णनीयच आहे. हल्ल्याची बातमी ऐकताच १९६२, १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या ७६ वर्षीय मोरे यांची छाती गर्वाने फुलून आली. आपसूकच त्यांच्या तोंडातून शब्द निघाले, ‘मुझे चिंता नही है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, तिरंगा हो कफन मेरा बस यही अरमान रखता हूं’ ! केवळ सुधाकर मोरेच नव्हे तर उपराजधानीतील अनेक माजी सैनिक युद्ध झाल्यास युद्धभूमीत जाण्यासाठी तयार आहेत. ‘वन्स अ सोल्जर, आॅलवेज अ सोल्जर’ असे म्हणतात ते उगाच नाही याचा प्रत्यय उपराजधानीतील नागरिकांना येत आहे.उरीच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईचे उपराजधानीत सर्वत्र स्वागत होत आहे. ‘लातों के भूत बातों से नही मानते’ असे म्हणत माजी सैनिकांनी तर अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला. या हल्ल्याची परिणती युद्धात होऊ शकते याची सर्वांनाच कल्पना आहे. जर युद्ध झाले तर देशासाठी आजही छातीवर गोळ्या खायला तयार आहोत. देशाच्या मातीचे आमच्यावर कर्ज आहे व मातृभूमीसाठी आजदेखील रणभूमीत सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, अशा भावना माजी सैनिकांनी बोलून दाखविल्या. राम कोरके, सिद्धार्थ मंडपे, दत्ता चिरडे, विलास दवणे, सुनील फुटाणे, नीळकंठ व्यास, गुंडेराव ढोबळे, बाबू गनी खान, अशोक भुजाडे, मनोहर भातकुलकर, चंद्रशेखर आलेगावकर, पुंडलिक सावंत या माजी सैनिकांनीही अशीच भावना व्यक्त केली.