शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीच्या अभावामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसमोरदेखील अडचण झाल्याचे चित्र असून, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीच्या अभावामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसमोरदेखील अडचण झाल्याचे चित्र असून, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे. अशा नागपूरला ५० हजार लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे या आठवड्यात कमीतकमी ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरळीत होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यातील अर्ध्या लसी ग्रामीण भागात वापरण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ओदिशा राज्यातील अंगुळ येथून चार टँकर ऑक्सिजन रात्री उशिरा नागपूरला रेल्वेद्वारे पोहोचणार आहे. मंगळ‌वारी जिल्ह्याला १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. शहरात पर्याप्त ऑक्सिजन उपलब्ध आहे. जिल्ह्यात मंगळवारी २,९७३ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. या इंजेक्शनची मागणी करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाला व खासगी हॉस्पिटलला त्याचे निर्धारित वितरण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ग्रामीण भागात जनजागृती

नागपूर जिल्हा प्रशासन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात माघारलेल्या गावांना प्रबोधनाचा बूस्टर डोस देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, गावातील तरुणांचे लसीकरण व पॉझिटिव्ह संख्या कमी करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी गावे पिंजून काढत आहेत. गावातील भेटीदरम्यान सध्या त्रिसूत्रीवर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये कोरोना आजाराची तीव्रता सांगणारी सहा मिनिटाची वॉकिंग टेस्ट, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार पद्धती आणि तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांचे कोरोनापासून कशा पद्धतीने संरक्षण करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे.

बालरोगतज्ज्ञांची बैठक

दरम्यान, मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपुरातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये मुलांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बालरोगतज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.