शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘सुपर स्पेशालिटी’ बॅ.अंतुलेंची देण

By admin | Updated: December 3, 2014 00:40 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे,

विदर्भावर होते विशेष प्रेम: काँग्रेस नेत्यांनी दिला आठवणींना उजाळानागपूर: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे, अशी मागणी करणारी एक चिठ्ठी गेली आणि अंतुले यांनी त्याच क्षणी नागपुरात सुपर स्पेशालिटी इस्पितळाची घोषणा केली.अंतुलेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केलेले काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी व त्यावेळी रामटेकचे आमदार म्हणून सभागृहात उपस्थित असलेले अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी ही आठवण सांगितली. अंतुले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची तसेच नागपूरसह विदर्भाविषयी असलेल्या आस्थेची आवर्जून आठवण केली.मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा नागपूरसह विदर्भाला लाभ झाला. गडचिरोली जिल्ह्याची अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली. १९८० मध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन होते .शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा ऐरणीवर होता. याच अधिवेशनात अंतुले यांनी एका झटक्यात कर्जमाफीची घोषणा केली होती. विदर्भ विकासाचा कार्यक्रम तयार झाला होता. सभागृहात मुख्यमंत्री तो जाहीर करीत असतानाअ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी नागपूरमध्ये सुसज्ज इस्पितळ असावे, अशी सूचना त्यावेळी आरोग्य राज्यमंत्री असलेले सतीश चतुर्वेदी यांच्याकडे केली. एका साध्या कागदावर ही सूचना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचविली. त्या आधारावच अंतुले यांनी नागपुरात सुपर स्पेशालिटी सुरू करण्याची घोषणा केली. नंतर याचा समावेश विदर्भ विकास कार्यक्रमात करण्यात आला होता, अशी आठवण या नेत्यांनी सांगितली. (प्रतिनिधी)झटपट निर्णय घेणारा नेतामी राज्यमंत्री असूनही विदर्भातून आलेलो असल्याने या भागातील निर्णय घेताना ते विश्वासात घेत असत. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच नागपूरमध्ये आले असताना त्यांनी रामगिरीवर आम्हाला ब्लॉक पातळीवर तालुक्याची निर्मिती करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करायला सांगितले.त्यांनी त्याला मान्यताही दिली. त्यावेळी ३० ते ४० नवीन तालुके निर्माण झाले होते. विदर्भ दौऱ्यावर असतानाच तालुक्याच्या ठिकाणी हुतात्मा स्मारक असावे, अशी कल्पना सूचली व तत्काळ त्यांनी त्यांची अंमलबजावणीही केली. विदर्भात आठ नवीन आयटीआय सुरू केले. झटपट निर्णय घेणारे ते नेते होते.सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व काँग्रेस नेते.विदर्भाविषयी आस्थाएक अभ्यासू मुख्यमंत्री होते. त्यांना विदर्भाविषयी आस्था होती. अनुशेषाचा मुद्दा पोटतिडकीने मांडत असल्याने ते नेहमीच माझे कौतुक करायचे. नागपूर, विदर्भाच्या संदर्भातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. एक कर्तृत्ववान नेतृत्व त्यांच्या निधनाने हरपले आहे.अ‍ॅड. मधुकर किंमतकर, माजी मंत्री