शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

‘सुपर स्पेशालिटी’ बॅ.अंतुलेंची देण

By admin | Updated: December 3, 2014 00:40 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे,

विदर्भावर होते विशेष प्रेम: काँग्रेस नेत्यांनी दिला आठवणींना उजाळानागपूर: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे, अशी मागणी करणारी एक चिठ्ठी गेली आणि अंतुले यांनी त्याच क्षणी नागपुरात सुपर स्पेशालिटी इस्पितळाची घोषणा केली.अंतुलेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केलेले काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी व त्यावेळी रामटेकचे आमदार म्हणून सभागृहात उपस्थित असलेले अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी ही आठवण सांगितली. अंतुले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची तसेच नागपूरसह विदर्भाविषयी असलेल्या आस्थेची आवर्जून आठवण केली.मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा नागपूरसह विदर्भाला लाभ झाला. गडचिरोली जिल्ह्याची अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली. १९८० मध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन होते .शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा ऐरणीवर होता. याच अधिवेशनात अंतुले यांनी एका झटक्यात कर्जमाफीची घोषणा केली होती. विदर्भ विकासाचा कार्यक्रम तयार झाला होता. सभागृहात मुख्यमंत्री तो जाहीर करीत असतानाअ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी नागपूरमध्ये सुसज्ज इस्पितळ असावे, अशी सूचना त्यावेळी आरोग्य राज्यमंत्री असलेले सतीश चतुर्वेदी यांच्याकडे केली. एका साध्या कागदावर ही सूचना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचविली. त्या आधारावच अंतुले यांनी नागपुरात सुपर स्पेशालिटी सुरू करण्याची घोषणा केली. नंतर याचा समावेश विदर्भ विकास कार्यक्रमात करण्यात आला होता, अशी आठवण या नेत्यांनी सांगितली. (प्रतिनिधी)झटपट निर्णय घेणारा नेतामी राज्यमंत्री असूनही विदर्भातून आलेलो असल्याने या भागातील निर्णय घेताना ते विश्वासात घेत असत. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच नागपूरमध्ये आले असताना त्यांनी रामगिरीवर आम्हाला ब्लॉक पातळीवर तालुक्याची निर्मिती करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करायला सांगितले.त्यांनी त्याला मान्यताही दिली. त्यावेळी ३० ते ४० नवीन तालुके निर्माण झाले होते. विदर्भ दौऱ्यावर असतानाच तालुक्याच्या ठिकाणी हुतात्मा स्मारक असावे, अशी कल्पना सूचली व तत्काळ त्यांनी त्यांची अंमलबजावणीही केली. विदर्भात आठ नवीन आयटीआय सुरू केले. झटपट निर्णय घेणारे ते नेते होते.सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व काँग्रेस नेते.विदर्भाविषयी आस्थाएक अभ्यासू मुख्यमंत्री होते. त्यांना विदर्भाविषयी आस्था होती. अनुशेषाचा मुद्दा पोटतिडकीने मांडत असल्याने ते नेहमीच माझे कौतुक करायचे. नागपूर, विदर्भाच्या संदर्भातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. एक कर्तृत्ववान नेतृत्व त्यांच्या निधनाने हरपले आहे.अ‍ॅड. मधुकर किंमतकर, माजी मंत्री