शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

सुपर ‘सिक्सटी’ला विद्यापीठात सुरुंग

By admin | Updated: July 19, 2016 02:55 IST

टेक्नोसेव्ही प्रशासनासह ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना वास्तवात साकारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मात्र देशातील

देशातील मोठे आॅनलाईन मूल्यांकन केंद्र : तेही महत्त्वाच्या चार पदाविनाजितेंद्र ढवळे ल्ल नागपूरटेक्नोसेव्ही प्रशासनासह ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना वास्तवात साकारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मात्र देशातील सर्वात मोठे आॅनलाईन मूल्यांकन केंद्र उभारणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात टेक्नोसेव्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना ब्रेक लागला आहे. संगणक केंद्रप्रमुख, सिस्टीम अ‍ॅनालिस्ट, डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क इंजिनिअर या प्रमुख चार अधिकाऱ्यांविना परीक्षाविषयक कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. यासाठी विद्यापीठाने खासगी संस्थेची मदत घेतली आहे. उद्या जर या खासगी संस्थेला विद्यापीठाचे काम मिळाले नाही तर त्यांच्याजवळील असलेला ‘डेटा’ गोपनीय कसा राहील, हाही एक प्रश्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच गतिमान प्रशासनासाठी राज्य सरकारने वर्ग-१ संवर्गातील ६० अधिकाऱ्यांची पदे नागपूर विद्यापीठाला आकृतिबंधात मंजूर केली आहेत. तत्कालीन कुलसचिव सुभाष बेलसरे यांनी विद्यापीठात सुपर ‘सिक्सटी’ची संकल्पना मांडली होती. मात्र पाच वर्षांनंतरही सुपर ‘सिक्सटी’ने अद्यापही ५० टक्क्यांचाही आकडा गाठलेला नाही.विद्यापीठाच्या सुपर ‘सिक्सटी’ टीममध्ये १६ उपकुलसचिव, संगणक केंद्रप्रमुख (१), सिस्टीम अ‍ॅनालिस्ट(१), डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (१), विद्यापीठ अभियंता (१), विधी अधिकारी (१), सहायक कुलसचिव (२८), नेटवर्क इंजिनीअर (१), प्रोग्रामर (१), प्रकाशन अधिकारी (१), जनसंपर्क अधिकारी (१), वैद्यकीय अधिकारी (१), उपअभियंता (स्थापत्य) - १, उपअभियंता (विद्युत) - १ आणि वास्तुशास्त्रज्ज्ञ - १ असा प्रमुख पदांचा समावेश आहे. उपकुलसचिव पदाला साडेसातीमुंबई विद्यापीठाच्या बरोबरीने १६ उपकुलसचिव पदांना नागपूर विद्यापीठात मान्यता आहे; मात्र अद्यापही सात जागा रिक्त आहेत. उपकुलसचिव पदामागची साडेसाती कायम आहे. अंतर्गत राजकारणामुळे कामाचा हिरमोड झाल्याने यातील तिघे ‘लिन’वर (धारणाधिकार) आहे. त्यांनी दुसऱ्या शासकीय संस्थांत नोकऱ्या मिळविल्या आहेत. काही काळ वित्त व लेखा अधिकारी पदावरही उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यावरच प्रभार सोपविण्यात आला. प्रशासनात महत्त्वाचा घटक असलेल्या सहायक कुलसचिवांच्या बाबतीतही हेच आहे. पदे २८ असली तरी यापैकी १८ रिक्त आहेत. काही अधीक्षकांना सहायक कुलसचिव होण्याचे स्वप्न मधल्या काळात पडली. यातही राजकारण शिरले.